पृथ्वीवरील केवळ ०.५ टक्के पाणी वापरण्यायोग्य
‘तिसरे महायुद्ध पाण्यावरून होईल’, असे यापूर्वीच म्हटले गेले आहे. तेच ही चेतावणी सांगत आहे. विज्ञानाने गेल्या १०० – १५० वर्षांत पृथ्वीची अशी दयनीय स्थिती करून टाकली आहे, याविषयी विज्ञानवाद्यांना लाज वाटली पाहिजे ! – संपादक

न्यूयॉर्क (अमेरिका) – जागतिक स्तरावर ५०० कोटींहून अधिक लोकांना वर्ष २०५० पर्यंत भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, अशी चेतावणी संयुक्त राष्ट्रांनी दिली आहे. ‘हवामानातील पालटामुळे पूर आणि दुष्काळ यांसारख्या पाण्याशी संबंधित धोक्यांचा जागतिक धोका वाढत आहे, तसेच पाणीटंचाईची झळ बसणार्या लोकांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे.
The world is facing a looming water crisis, @WMO and partners warn in new #ClimateServices for #Water report.
Countries must improve water management, monitoring and early warning for disasters such as floods and drought. #ClimateAction https://t.co/gDUVnFBmYA
— UN News (@UN_News_Centre) October 5, 2021
‘द स्टेट ऑफ क्लायमेट सर्व्हिसेस २०२० : वॉटर’ नावाच्या अहवालातील आकडेवारीनुसार वर्ष २०१८ मध्ये ३६० कोटी लोकांना प्रतिवर्षी किमान एक मास तरी पाणी अपूर्ण प्रमाणात उपलब्ध होते. २०५० पर्यंत हे प्रमाण ५०० कोटींहून अधिक होण्याची शक्यता आहे. या अहवालात पाण्याचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची आवश्यकता प्रतिपादित करण्यात आली आहे. यासह शाश्वत विकास आणि हवामान पालट यांच्याशी जुळवून घेणे आवश्यक असल्याचेही म्हटल आहे. पृथ्वीवरील केवळ ०.५ टक्के पाणी वापरण्यायोग्य असल्यामुळे परिस्थिती बिकट होत आहे.
Kerala Shigella Outbreak Reported : केरळम्मध्ये ‘शिगेला’ संसर्गामुळे एका मुलाचा मृत्यू, १२६ जणांना लागण !
Dominican Republic Plane Crash : ‘डोमिनिकन रिपब्लिक’मध्ये जेट कोसळले : वैमानिक आणि सह-वैमानिक ठार !
Iran Israel War : इराण-इस्रायल यांच्यात पुन्हा उडाला युद्धाचा भडका !
Philippines Earthquake : फिलिपीन्समध्ये ७.८ रिक्टर तीव्रतेचा भूकंप : १९ जणांचा मृत्यू !
Singapore Blocks Media : भारतियांना अपकीर्त करण्याची चिनी नागरिकांची ऑनलाईन मोहीम सिंगापूर सरकारकडून उघड
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !