|

पणजी, १९ सप्टेंबर (वार्ता.) – श्री गणेशचतुर्थीच्या काळात तिसर्या दिवशी काही कामगारांनी हातात बिअरची बाटली घेऊन धांगडधिंगा घालून श्री गणेशमूर्ती विसर्जन करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी काँग्रेसचे पर्वरी येथील स्थानिक नेते अधिवक्ता शंकर फडते, प्रशांत शेट आणि दीपेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली पर्वरीवासियांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे. (याविषयी पर्वरीवासियांचे अभिनंदन ! – संपादक)
प्राप्त माहितीनुसार पर्वरी येथे १२ सप्टेंबर या दिवशी (श्री गणेशचतुर्थीच्या तिसर्या दिवशी) महामार्गाचे काम करणार्या एका कंत्राटदाराच्या सुमारे १०० कामगारांनी रस्त्यावरून हातात बिअरची बाटली घेऊन धांगडधिंगा घालून श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक काढली आणि श्रींचे विसर्जन केले. (हा धांगडधिंगा चालू असतांना पोलीस काय करत होते ? संचारबंदी असतांना अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करून धांगडधिंगा चालू रहाणे म्हणजे कायदा अन् सुव्यवस्थेचे वाटोळेच म्हणायचे ! – संपादक) वास्तविक गणेशोत्सवाच्या काळात श्री गणेशमूर्तीचे विसर्जन दीड, ५, ७, ९, ११ आणि २१ यांदिवशी केले जाते. ३ दिवसांनी विसर्जन केले जात नाही. संबंधित कंत्राटदाराने कामगारांना मद्यप्राशन करण्यासाठी पैसे दिले. कामगारांनी गणेशोत्सवाच्या तिसर्या दिवशी धांगडधिंगा घालून श्री गणेशमूर्तीचे विसर्जन केले. परप्रांतीय कामगारांनी धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी जाणूनबुजून ही कृती केली असून या कामगारांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. याविषयी अधिवक्ता शंकर फडते म्हणाले, ‘‘या कृतीमुळे केवळ धार्मिक भावनाच दुखावल्या असे नाही, तर गोवा आणि गोव्यातील संस्कृतीला अपकीर्त करून तिला न्यून लेखण्यात आले आहे.’’
डोंबिवली येथे ‘महावितरण’चा खांब कोसळून २ दुचाकींची हानी !
तावडे हॉटेल परिसरातील २३ अनधिकृत बांधकामे तोडली : महापालिकेची कारवाई
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
आदिवासींच्या घरांच्या बांधकामाला मुसलमानांचा विरोध : पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर काम चालू
क्षुल्लक कारणावरून धर्मांध रिक्शाचालकाचे हिंदु बसचालकावर आक्रमण !
अकोला येथे मुसलमानांचा गोरक्षकांशी वाद : पोलिसांनी मुसलमानाला सोडून दिल्याचा भाजपचा आरोप !