
१. सनातन-निर्मित शाडूच्या मातीची मूर्ती घरी आणल्यापासून घरातील वातावरण चैतन्यमय आणि आनंदी वाटणे
‘या वर्षी सनातन-निर्मित श्री गणेशमूर्ती दळणवळण बंदीमुळे घरपोच येणार होती; म्हणून मी प्रथमच सनातनची शाडूच्या मातीची मूर्ती घरी आणली. मूर्ती घरी आणल्यापासून घरातील चैतन्यात वाढ होऊन वातावरण आनंदी झाले होते आणि पूजा करतांना माझी भावजागृती होत होती.
२. सकाळी निर्माल्य काढल्यावर आदल्या दिवशी गणपतीच्या मूर्तीवर वाहिलेली बेलाची पाने टवटवीत आणि ताजी दिसणे अन् या पानांवर पांढरे शुभ्र दैवी कण दिसणे

१.९.२०२० या दिवशी अनंत चतुर्दशी होती. तेव्हा सकाळी गणपतीची पूजा करण्यास गेले असता निर्माल्य काढतांना लक्षात आले की, गणपतीच्या मूर्तीवर वाहिलेली बेलाची पाने टवटवीत आणि ताजी दिसत होती. इतर देवतांवर वाहिलेली बेलाची पाने सुकलेली होती. तसेच या पानांवर पांढरे शुभ्र दैवी कण होते.
३. बेलाच्या पानांच्या माध्यमातून देवाने अनुभूती देऊन मला आशीर्वाद दिल्यासारखा वाटणे
माझी १० दिवस गणपतीला प्रार्थना होत होती, ‘देवा, जातांना माझ्या साधनेतील प्रगतीसाठी मला आशीर्वाद देऊन जा.’ बेलाच्या पानांच्या माध्यमातून देवाने अनुभूती देऊन खरेच मला आशीर्वाद दिल्यासारखा वाटत आहे. मी अनेक वर्षे घरी गणपति बसवते; पण अशी अनुभूती मला प्रथमच आली. यासाठी श्री गणेश आणि परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– सौ. वर्षा ठकार, पुणे (ऑक्टोबर २०२०)
| या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
पू. शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे संत, वय ७९ वर्षे) आणि श्री. तुकाराम लोंढे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६० वर्षे) यांनी अनुभवलेली प्राणदाते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा !
प्रभुदेसाई कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !
व्यष्टी साधना गांभीर्याने करणारे म्हार्दाेळ (गोवा) येथील श्री. परशुराम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७८ वर्षे) आणि सौ. पूनम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७९ वर्षे) !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
पू. (कै.) श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय १०४ वर्षे) यांचे अंत्यदर्शन घेतांना डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील साधकांनी अनुभवलेली उच्च आध्यात्मिक स्थिती !
वर्ष २०२५ मध्ये प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभपर्वाच्या कालावधीत साधिकेने भाववृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि तिला आलेल्या अनुभूती !