
ठाणे, ३१ ऑगस्ट (वार्ता.) – कल्याण तालुक्यातील वरप येथील भूमींविषयीच्या हरकतीवरील सुनावणीचे निकालपत्र देण्यासाठी कल्याण येथील तहसीलदार दीपक आकडे यांनी १ लाख रुपयांची लाच मागितली, तसेच लाचेची रक्कम शिपाई मनोहर हरड यांच्याकडे देण्यास सांगितले. हरड यांनीही स्वत:साठी आणि कर्मचार्यांसाठी २० सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ही रक्कम घेतल्याचे ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्यातून निष्पन्न झाल्याने तहसीलदार आकडे आणि शिपाई हरड यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी. – संपादक)
एवढी बेहिशोबी संपत्ती गोळा केली जात असतांना सरकार झोपले होते का ?
थोडक्यात महत्त्वाचे : १०.०६.२०२६
‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण ‘हिमनगाचे टोक’ ?
तरुण पिढी उद्ध्वस्त करणार्या ‘रेव्ह’ मेजवान्यांचे आयोजन करणार्यांवर थेट ‘मकोका’ लावा ! – संजय शिरसाट, पालकमंत्री
नोंदणीकृत औषधविक्रेता नसलेली औषधालये बंद होणार !
‘म्हजे घर’च्या सर्व अर्जदारांना ६ महिन्यांत सनद मिळणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री