
१. प्रसंग
‘एका साधिकेने आढावा देत असतांना सांगितले की, त्यांच्या घरातील साधिका मुलगी त्यांना म्हणाली, ‘‘तू स्वभावदोष निर्मूलन सारणीमध्ये घरातील प्रसंग लिहीत जाऊ नकोस किंवा व्यष्टी साधनेचा आढाव्यात त्याविषयी चर्चाही करू नकोस. घरातील गोष्टी घरातच राहिलेल्या बर्या. याविषयी आपण आपापसांत बोलूया.’’
२. योग्य दृष्टीकोन
अ. समाजात वावरतांना किंवा आश्रमात सेवा करतांना बराच वेळ आपण ‘मनाची नाही, तर जनाची लाज बाळगून’ योग्य वागण्याचा प्रयत्न करत असतो; परंतु घरी मात्र आपण अशा मर्यादांचे पालन न करता स्वतःतील अनेक स्वभावदोषांचे प्रकटीकरण करत वागत असतो अन् घरातील मंडळींनाही त्याची सवय झाल्याने ते ती प्रकृती स्वीकारून तिच्याशी त्याप्रमाणे वागत असतात. अशा वागण्यामुळे अन्य कुठेही प्रकट न झालेले स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू घरात प्रकट होत असूनही त्यावर साधनेच्या दृष्टीने योग्य प्रक्रिया होत नाही.
आ. घरातील मंडळींशी वागतांना साधनेच्या दृष्टीकोनातून वागण्याऐवजी बर्याच वेळा व्यावहारिक दृष्टीकोनातून वागले जाते. त्यामुळे ‘आपण वागत आहोत, ते अयोग्य आहे’, हेही त्यांच्या लक्षात येत नाही. घरातील व्यक्तींसमवेत बरेच प्रसंग घडत असतात. त्याचा ताण मनावर रहात असल्याने बरेच विचार मनामध्ये सतत येत रहातात आणि त्याचा साधनेवर परिणामही होत असतो. वेळीच त्या प्रसंगांवर योग्य दृष्टीकोन घेऊन त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केल्यास विचारांमध्ये व्यय होणारी शक्ती वाचते.
इ. साधकांनी घरातील आपल्या वागण्या-बोलण्यातून होणार्या चुका शोधून प्रसंग व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सांगून त्यावर योग्य दृष्टीकोन घेणे आवश्यक आहे. काही प्रसंग जर आपण आढाव्यात सर्वांसमोर सांगू शकत नसू, तर असे प्रसंग आढावा संपल्यावर आढावासेवकांशी वैयक्तिकरित्या बोलून घेऊ शकतो.’
– (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१९.३.२०२०)
प्रेमळ आणि इतरांना निरपेक्षतेने साहाय्य करणारे फोंडा (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. आत्माराम जोशी (वय ८० वर्षे) !
मनोरुग्णांची स्थिती पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’च्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रिये’ला प्राधान्य देण्याचे साधिकेच्या लक्षात आलेले महत्त्व !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
साधकांनो, आपत्काळातील मार्गदर्शक म्हणून ‘सनातन प्रभात’मधील साधनेच्या संदर्भातील मार्गदर्शन संग्रही ठेवा !
गुरुकार्य वृद्धींगत होण्याचा आणि साधकांना घडवण्याचा ध्यास असलेल्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये !
देवाची आवड असणार्या आणि मुलीला सेवा करायला प्रोत्साहन देणार्या आगवे (तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) सुमती गजानन नाखरे (वय ८२ वर्षे) !