
नवी देहली – कोरोना अजून गेलेला नसून तो रंग पालटत आहे, अशी चेतावणी देशभरातील आधुनिक वैद्यांची शिखर संघटना असलेल्या ‘अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थे’चे म्हणजे ‘एम्स्’चे प्रमुख डॉ. नवनीत विग यांनी नागरिकांना दिली. देशभरात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने अनेक राज्यांकडून दळणवळण बंदी शिथिल केली जात आहे. त्यामुळे नागरिक घराबाहेर पडून सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. नागरिक मास्क लावण्यासारखा मूलभूत नियमही पाळतांना दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर डॉ. विग यांनी नागरिकांना वरील चेतावणी दिली.
डॉ. विग पुढे म्हणाले, ‘‘आपण सतर्क रहायला हवे. लोकांनी स्वच्छ मास्क घालायला हवेत, तसेच लवकरात लवकर स्वतःचे लसीकरण करून घ्यावे आणि कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करावे. जर कोरोनाची तिसरी लाट आली, तर आपण कुणाला दोषी धरणार आहोत ? आपल्याला प्रत्येक जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांचे प्रमाण (पॉझिटिव्हिटी रेट) १ टक्क्याहून न्यून करण्याच्या दृष्टीने आपली धोरणे आखली पाहिजेत अन् त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. यासह प्रत्येक जिल्ह्यात किमान ५० टक्के ‘ऑक्सिजन बेड’ रिकामे असायला हवेत.’’
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !
मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक !
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !