मागील सैन्य स्तरावरील बैठकीत माघार घेण्याची सहमती दर्शवली होती !
चीन विश्वासघातकी आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. चिनी सैन्याने जरी माघार घेतली असती, तरी त्याने परत अधिक गतीने भारतात घुसखोरी केली असती ! यामुळेच चीनपासून भारताने सतर्क रहाणेच आवश्यक !

नवी देहली – चीनने पूर्व लडाखमधील हॉट स्प्रिंग्ज, गोग्रा आणि देप्सांग येथील सीमेवरून सैन्याला मागे हटवण्यास नकार दिला असल्याचे समजते. भारत आणि चीन यांच्यामध्ये गेल्या आठवड्यात सैनिकी स्तरावर झालेल्या ११व्या फेरीत १३ घंटे चर्चा झाली होती. या चर्चेत चीनने गोग्रा, हॉट स्प्रिंग्स आणि देप्सांग पेट्रोलिंग पॉईंट १५ आणि पेट्रोलिंग पॉईंट १७ ए या भागांतून सैन्य मागे घेण्यास सहमती दर्शवली होती; मात्र आता चीनने त्याचेे सैन्य मागे घेण्यास नकार दिल्याचे समजते. भारतीय सैन्याने पेट्रोलिंग पॉइंट १५ आणि पेट्रोलिंग पॉइंट-१७ ए पर्यंत असलेली चिनी सैन्याची गस्त मान्य करावी अशीच चीनची इच्छा असल्याचे स्पष्ट होते आहे. ‘भारताला जेवढे मिळाले आहे, त्यात त्याने समाधानी असले पाहिजे’, असे चीनने म्हटले आहे.
China has refused to pull back its troops from Hot Springs and Gogra Post which remain the friction points between the two sides.https://t.co/dtrIh2KaiO
— News18.com (@news18dotcom) April 18, 2021
संपादकीय : ‘टिकी-टाका’ पद्धत यशस्वी !
Pakistan Supreme Court : १२ वर्षांनंतर सर्व आरोपींची पाकिस्तानच्या सर्वाेच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता !
Russia Ukraine War : भारतीय खलाशी असलेल्या नौकेवर रशियाकडून आक्रमण : ६ जण ठार
US Iran War : इराणमधील भारतियांनी शक्य तितक्या लवकर भारतात परतावे ! – भारत
पाक सैन्याने कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांचे मृतदेह हिंदूंच्या स्वाधीन केले ! – Maulana Fazlur Rehman
(म्हणे) ‘गेल्या वर्षी झालेला संघर्ष पंतप्रधान मोदी आणि पाकचे सैन्यदलप्रमुख असिम मुनीर यांच्यातील संगनमत होते !’ – Imran Khan Sister’s Claim