
‘१६.५.२०१५ या दिवशी सायंकाळी ७.१० वाजता आश्रमातील साधकांना आकाशातील रंग पहायला सांगितले होते. ते पहात असतांना माझे मन शांत झाले. ‘काही क्षण फिकट गुलाबी रंग, तर काही वेळाने सर्वत्र केवळ पांढरा रंग व्यापला आहे’, असे मला जाणवले. तेव्हा मी प्रार्थना करण्यासाठी हात जोडले; परंतु त्यात काहीच शब्द नव्हते. ‘त्या वेळी आकाश पांढर्या रंगाने प्रकाशमान झाले असून अनेक ऋषी आश्रमाच्या वरच्या बाजूला गोलाकार बसले आहेत’, असे मला दिसले. ‘ऋषी ध्यानस्थ बसले नव्हते; पण त्यांनी डोळे मिटले होते. त्यांनी डोळे उघडले आणि काही क्षणांतच ते अंतर्धान पावले. तेव्हा ‘जणू काही त्या ऋषीमुनींनाच नमस्कार करण्यासाठीच हात जोडले गेले’, असे मला जाणवले. त्यानंतर १ घंटा माझ्या शरिराच्या आसपास गार वार्याची झुळूक स्पर्श करून गेल्याप्रमाणे मला गारवा जाणवत होता.’ – होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
हनुमान जयंतीच्या दिवशी चारचाकी गाडीने जात असतांना साधकाची दृष्टी आकाशाकडे गेल्यावर त्याला ढगांमध्ये झालेले मारुतिरायाचे दर्शन !
म्हार्दोळ (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई (वय ७८ वर्षे) यांचा साधनाप्रवास !
हिंदु धर्मप्रेमी युवक-युवतींनो, ऋषिमुनी आणि देवता यांनी केलेल्या स्थुलातील कृतीमागील सूक्ष्म धर्मशास्त्र समजून न घेताच त्यांचे अनुकरण करू नका ! – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
‘श्रीसत्शक्ति, श्रीचित्शक्ति आणि सच्चिदानंद’, हे अध्यात्मातील शब्दब्रह्म असून त्यात पुष्कळ शक्ती असणे अन् ते शब्द उच्चारल्यावर त्यातून शक्ती, चैतन्य अन् तत्त्व मिळणे – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना केलेले अनमोल मार्गदर्शन !