
‘आज आपल्या देशात इतकी महागाई, भ्रष्टाचार, नक्षलवाद, आतंकवाद, गुन्हेगारी आणि बेकारी बोकाळली आहे की, चारही बाजूंनी लोक त्रस्त आहेत. सरकार मात्र सुस्त आहे. वर्षानुवर्षे हे चालूच आहे. भ्रष्टाचार, महागाई वगैरे न्यून नाही, तर उलट वाढतच चालली आहे. दुसरीकडे नेते, उद्योगपती ऐषोआरामात जगत आहेत. आज राबराब राबणारा उपाशी आणि कुपोषित जीवन जगत आहे. सामान्य माणसाचे जीवन जगणे हराम झाले आहे. आपण निवडलेले नेते काय करत आहेत ? हे जाणून घ्यायची इच्छाच नाही. ते ‘सत्तेतून पैसा-पैशातून सत्ता’ याप्रमाणे वागतात.
यातूनच मग भ्रष्टाचार बोकाळतो. सामान्य माणूस भरडला जातो, म्हणजेच सामान्य माणूसच या परिस्थितीला ‘मीच उत्तरदायी आहे’, असे म्हणायला काहीच हरकत नाही. आतापर्यंत सत्ता भोगणारे भोगतच राहिले, मी मात्र आहे तिथेच आहे. मी सोसतोय महागाईचे चटके आणि नेते जीवन जगतात नेटके ! इथून पुढे तरी असे व्हायला नको. याचा सर्वसामान्य जनतेने विचार करण्याची वेळ आली आहे.’
– श्री. सखाराम एकशिंगे (केनवडेकर), गोरंबे, कागल, कोल्हापूर.
कंटेनर वाहतुकीला चालना देण्यासाठी प्रयत्न : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पहिली समर्पित कंटेनर रेल्वे चालू करणार !
शहरवासियांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा ! – निमेश नायर
Terrorist Allahbaksh Arrested : तुमकुरू (कर्नाटक) येथील अल्ला बक्षला अटक
Bulandshahr Temple Namaz : बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे हनुमान मंदिरात नमाजपठण करणार्या असर महंमद यास अटक !
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !