
‘मी रामनाथी आश्रमात जात असतांना संपूर्ण प्रवासात कुलदेवी श्री भवानीदेवीचा नामजप करत होतो. आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारातून चारचाकीने आत प्रवेश करतांना ‘माझा कुलदेवीचा नामजप बंद होऊन ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप चालू झाला’, हे आश्रमात काही अंतर चालून गेल्यावर माझ्या लक्षात आले. त्या वेळी ‘मी एखाद्या भगवान शिवाच्या तीर्थक्षेत्री आहे’, असे मला वाटत होते. दुसर्या दिवशी मी आश्रम पहातांना आश्रमात ३ ठिकाणी श्री विद्याचौडेश्वरीदेवीने दिलेला संदेशरूपी आशीर्वाद आणि शिवपिंडीचे चित्र पाहिल्यावर ‘काल माझा नामजप का पालटला ?’, ते मला समजले.’
– श्री. गणेश मुरलीधर बुचडे, पलूस, सांगली. (१२.३.२०२०)
| या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
‘आपले खरे कुटुंब हे आपले साधक आहेत’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या वचनाची साधिकेला आलेली प्रचीती !
राष्ट्रप्रेमी, धर्माभिमानी आणि इतरांना साहाय्य करणारे अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे मुंबई येथील श्री. मुंडाची वेदव्यास पै (वय ९१ वर्षे) !
‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या स्थळी सनातन राष्ट्रध्वज फडकवण्याच्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे
देवाच्या प्राप्तीसाठी एका क्षणात मायेचा त्याग करणारे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !
कै. (श्रीमती) उषा बोकाडे यांच्या रुग्णाईत स्थितीत आणि त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अनुभवलेली प्रीती !