‘काळा रंग तमप्रधान आहे. त्यामुळे काळ्या रंगातून तामसिक स्पंदने वातावरणात पसरून सूक्ष्म स्तरावर वातावरण दूषित होते. काळ्या रंगाकडे वाईट शक्तीही आकृष्ट होतात. त्यामुळे काळ्या रंगाचे बूट, कोट, साडी, टाय किंवा टोपी धारण केल्यामुळे व्यक्तीच्या भोवती त्रासदायक शक्तीचे आवरण निर्माण होते आणि तिला वाईट शक्तींचा त्रासही होऊ शकतो. काळ्या रंगाकडे सगुण-निर्गुण स्तरावरील त्रासदायक काळी शक्ती आकृष्ट झाल्यामुळे व्यक्तीचे शरीर, मन, बुद्धी आणि अहं यांवर त्रासदायक काळे आवरण निर्माण होऊन त्याच्यावर नियंत्रण मिळवणे वाईट शक्तींना सोपे जाते. त्यामुळे काळ्या रंगाच्या वस्तू धारण केल्यामुळे व्यक्तीला वाईट शक्तींचा त्रास अधिक प्रमाणात होतो.

१. काळ्या रंगाची वस्तू, त्यांचा विविध अवयव आणि कुंडलिनीचक्र यांवर होणारा दुष्परिणाम अन् दुष्परिणामांचे स्वरूप

२. आध्यात्मिक पातळीनुसार काळ्या रंगाच्या वस्तूंचा होणार्या दुष्परिणामांचे प्रमाण आणि हा दुष्परिणाम दूर करण्यासाठी व्यय होणार्या साधनेचा कालावधी


३. निष्कर्ष
अ. इतर रंगांच्या तुलनेत काळा रंग सर्वांत तमोगुणी असल्यामुळे काळ्या रंगाच्या वस्तूंमुळे सर्वाधिक प्रमाणात आध्यात्मिक हानी आणि त्रास होतो.
आ. व्यक्तीची आध्यात्मिक पातळी वाढल्यावर तिच्यावरील काळ्या रंगाच्या वस्तूंच्या दुष्परिणामांचे प्रमाण न्यून होते. यावरून साधना करून आध्यात्मिक पातळी वाढवण्याचे महत्त्व लक्षात येते.
इ. प.पू. भक्तराज महाराजांसारख्या परात्पर गुरूंची सात्त्विकता आणि चैतन्य इतके अधिक होते की, त्यांनी काळी टोपी किंवा काळा कोट परिधान केला, तरी त्यांच्यावर काळ्या रंगाचा कोणताच दुष्परिणाम होत नसे. या उलट त्यांनी परिधान केलेल्या वस्तूंवर त्यांच्यातील चैतन्याचा परिणाम होऊन त्यांनी वापरलेली काळी टोपी किंवा काळा कोट यांच्यातील तमोगुणी स्पंदने नष्ट होऊन त्यांच्यामध्ये सात्त्विकता आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असे.
ई. काळ्या रंगाच्या अगदी विरुद्ध रंग पांढरा आहे. त्यामुळे पांढर्या रंगाच्या वस्तू परिधान केल्यामुळे व्यक्तींची सात्त्विकता, सकारात्मक ऊर्जा आणि चैतन्य यांचे प्रमाण पुष्कळ प्रमाणात वाढते, तसेच त्यांचे वाईट शक्तींपासून रक्षणही होते.
वरील सूत्रांवरून हे सुस्पष्ट होते की, व्यक्तींनी काळ्या रंगाच्या वस्तूंचा वापर करणे शक्यतो टाळावे.’
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.६.२०२०, रात्री १०.४५)
|
श्री विठ्ठलमूर्ती संवर्धनासाठी रासायनिक लेपनाला विरोधच; धर्मशास्त्रानुसार लेपन करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ
प्रेमळ आणि इतरांना निरपेक्षतेने साहाय्य करणारे फोंडा (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. आत्माराम जोशी (वय ८० वर्षे) !
मनोरुग्णांची स्थिती पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’च्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रिये’ला प्राधान्य देण्याचे साधिकेच्या लक्षात आलेले महत्त्व !
पू. शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे संत, वय ७९ वर्षे) आणि श्री. तुकाराम लोंढे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६० वर्षे) यांनी अनुभवलेली प्राणदाते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !