
कणकवली (सिंधुदुर्ग) – यावर्षी जिल्ह्यातील अटीतटीच्या आणि प्रतिष्ठेच्या ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांनी सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रचार चालू केला आहे. निवडणुका असलेल्या गावातील प्रभागात लढतीतील उमेदवार ‘डिजिटल’ प्रचारावर भर देत आहेत. याद्वारे प्रतिस्पर्धी उमेदवारांवर टीका-टिप्पणी केली जात आहे.
जिल्ह्यात ७० ग्रामपंचायती आहेत; मात्र काही ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या आहेत, तर काही प्रभागातील उमेदवाराची बिनविरोध निवड झाली आहे. सध्या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्यामुळे निवडणूक प्रचाराची पद्धतही पालटली आहे. बहुतांश गावांमध्ये विविध पक्षांच्या सदस्यांनी गावांतील तरुणांचा व्हाट्सअॅप गटही बनवला आहे. या व्हाट्सअॅप गटाच्या माध्यमातून गावाची समस्या आणि सर्वांगीण विकास या संदर्भातील योग्य उमेदवार कोण, याविषयी माहिती दिली जात आहे.
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !
ठाणे येथे २५ वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा; संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर मोर्चा