
मुंबई – राज्यशासन पोलीस खात्याच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करत आहे. मुख्यमंत्र्यांनी देखरेखीचे काम करणे अपेक्षित असते; मात्र स्थानांतरापासून प्रत्येक गोष्टीमध्ये हस्तक्षेप होतांना दिसत आहे. त्यामुळे सरकारच्या कारभाराला कंटाळूनच महासंचालकांनी प्रतिनियुक्ती स्वीकारली, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केला आहे. ही परिस्थिती महाराष्ट्रासारख्या राज्याला भूषणावह नाही, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांच्या बदलीवरुन देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर साधला निशाणा #DevendraFadnavis #UddhavThackeray #Abpmajha @RajatVAbphttps://t.co/TdWvpVckUV
— ABP माझा (@abpmajhatv) December 31, 2020
महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी केंद्रात सहभागी होण्यासाठी पदाचे त्यागपत्र स्वीकारण्याची विनंती राज्यशासनाकडे केली होती. ती संमत झाल्यानंतर आता जयस्वाल यांची नियुक्ती औद्योगिक सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावरून फडणवीस यांनी राज्यशासनावर टीका केली आहे.
कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
Ram Mandir Donation Theft : श्रीराममंदिरातील दान चोरीनंतर मंदिराचे सरकारीकरण होण्याची शक्यता
बिदर (कर्नाटक) : महाहिंदु मेळाव्याला अनुमती मिळताच समाजकंटकांकडून श्रीरामाचा अवमान !
तुमच्याकडे वर्दी आहे; म्हणजे तुम्ही काहीही करू शकता का ? – Karnataka High Court
इस्लाम स्वीकारल्यास आपोआप ‘मागासवर्गीय मुसलमान’ दर्जा मिळू शकत नाही ! : Madras High Court
कोलकाता : ‘इस्कॉन’ने शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह भोजनातून अंडे हटवल्याने वाद !