
सांगली – राज्यात महाविकास आघाडी सरकार असतांना सांगली जिल्ह्यातील स्थानिक शासकीय समित्यांवरील निवडींमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडून जिल्ह्यातील शिवसैनिकांना दुय्यम वागणूक मिळत आहे, अशा तक्रारी शिवसैनिक करत आहेत. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या दौर्यात २२ डिसेंबर या दिवशी शिवसैनिकांनी पालकमंत्र्यांविषयी तक्रारींचा पाढा वाचला. ‘या तक्रारींचे निरसन करण्यासाठी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेईन आणि त्यांच्यापुढे आपले गार्हाणे मांडीन’, असे आश्वासन मंत्री देसाई यांनी दिले.
ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सांगलीतील जैन कच्छी भवनमध्ये शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. या वेळी अनेक पदाधिकार्यांनी पालकमंत्र्यांच्या विरोधात तक्रारी मांडल्या.
ह.भ.प. विनायक केशव कुलकर्णी यांना शिर्डी येथे ‘महाराष्ट्र गुणगौरव समाजरत्न’ पुरस्कार प्रदान !
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
मुलींमध्ये शौर्य आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण आवश्यक ! – प्रा. (सौ.) ज्योती वाघमारे, खासदार, शिवसेना
तुर्भे विभागात विद्युत् पुरवठा वारंवार खंडित; जनता त्रस्त !
स्थानांतरासाठी शिक्षकाकडून २५ सहस्र रुपयांची लाच घेतांना अधिकारी डी.सी. कुंभार यांना अटक
अक्कलकोट येथे शाळकरी मुलीवर अत्याचार करणार्या अरबाजला अटक !