निरपेक्षता

निरपेक्षता

अगदी निरपेक्ष रहा, तसेच परत फेडीचीही आशा बाळगू नका. तुम्हाला जे काय द्यावयाचे असेल, ते द्या. ते तुम्हाला परत मिळेलच; पण त्याचा सध्या विचारही करू नका. कितीतरी पटीने नव्हे, सहस्रो पटींनी ते तुम्हाला परत मिळेल; पण त्यावरच तुमचे लक्ष असता कामा नये.             

स्वामी विवेकानंद यांचे कर्माविषयीचे विचार

स्वामी विवेकानंद यांचे कर्माविषयीचे विचार

तुम्ही एखाद्या धन्याप्रमाणे स्वाधीन भावाने कर्म केले पाहिजे, गुलामाप्रमाणे नव्हे. सतत कर्म करा; पण गुलामाप्रमाणे नव्हे.

स्‍वामी विवेकानंद यांचे  कर्माविषयीचे विचार

स्‍वामी विवेकानंद यांचे कर्माविषयीचे विचार

निरंतर कर्म करा; पण बंधनात पडू नका. ध्‍यानात असू द्या की, बंधन फार भयंकर असते.

स्वामी विवेकानंद यांचे कर्म करण्याविषयीचे विचार

स्वामी विवेकानंद यांचे कर्म करण्याविषयीचे विचार

अशुद्ध विचार वा अशुद्ध कल्पना ही अशुद्ध कर्माएवढीच वाईट आहे. आपल्या इच्छेवर जर आपले प्रभुत्व असेल, तर त्यापासून नेहमी सर्वाेच्च फळाचीच प्राप्ती होईल.

धर्म आणि अधर्म यांची व्याख्या

धर्म आणि अधर्म यांची व्याख्या

जे काही प्रगतीत अडथळा निर्माण करते वा जे काही अधःपतनाला साहाय्य करते, तो अधर्म आणि जे काही आपल्याला उन्नत होण्यास अन् आपल्या व्यक्तीत्त्वाच्या विभिन्न अंगामध्ये सुसंवाद निर्माण करण्यास साहाय्य करते, तो धर्म होय.

स्वामी विवेकानंद यांचे आत्मसंयमाविषयी विचार

स्वामी विवेकानंद यांचे आत्मसंयमाविषयी विचार

ज्याने आत्मसंयमाचा अभ्यास केलेला आहे, तो बाहेरील कोणत्याही गोष्टीने विचलित होऊ शकत नाही, तो कोणत्याही गोष्टीचा गुलाम बनत नाही…

कोणतेही कार्य क्षुद्र नाही !

कोणतेही कार्य क्षुद्र नाही !

हातातील कार्य अत्यंत आवडते असल्यास एखादा महामूर्खही ते पार पाडू शकतो; परंतु खरा बुद्धीमान तोच की, जो कोणत्याही कार्याला असे रूप देऊ शकतो की, ते त्याच्या आवडीचे होऊन जाते. कोणतेही कार्य क्षुद्र नाही, हे ध्यानात ठेवा.

स्वामी विवेकानंद यांची शिकवण

स्वामी विवेकानंद यांची शिकवण

जीवात्म्याचे निवासस्थान असलेले, हे शरीर कर्म करण्याचे एक अत्यंत उपयुक्त असे साधन आहे आणि जो माणूस, हे शरीर नरकतुल्य करतो, तो अपराधी आहे, तसेच जो माणूस शरिराची हेळसांड करतो, त्याची उपेक्षा करतो, तोही दोषास पात्र आहे.

स्वामी विवेकानंद यांचे कर्म करण्याविषयीचे अमूल्य मार्गदर्शन

स्वामी विवेकानंद यांचे कर्म करण्याविषयीचे अमूल्य मार्गदर्शन

स्वामी विवेकानंद यांची शिकवण १. प्रत्येक कर्माच्या फलामध्ये चांगले आणि वाईट या दोहोंचे मिश्रण असते. कोणत्याही सत्कर्मात वाईटाचा थोडा ना थोडा अंश असतोच. जिथे अग्नी तिथे धूर, तसेच कर्माला सर्वदा काही ना काही वाईट चिकटलेले असायचेच. ज्यामध्ये चांगल्याचा अधिकाधिक आणि वाईटाचा अगदी न्यूनतम अंश असेल, अशीच कर्मे आपण नेहमी करावीत. २. मत्सर आणि अहंकार यांचा … Read more

एखाद्याच्या पाठीमागे त्याची निंदा करणे हे पाप, तर ती ऐकणे महापाप !

एखाद्याच्या पाठीमागे त्याची निंदा करणे हे पाप, तर ती ऐकणे महापाप !

एखाद्याच्या पाठीमागे त्याची निंदा करणे, हे पाप होय. मनामध्ये पुष्कळशा गोष्टी उद्भवतील; पण त्या सर्वच व्यक्त कराल, तर हळूहळू राईचा पर्वत बनेल. तुम्ही जर क्षमा कराल आणि विसरून जाल, तर सारे काही तिथेच समाप्त होऊन जाईल.