स्वामी विवेकानंद यांच्या स्वदेश आणि स्वधर्म यांविषयीच्या हृद्य आठवणी
भारतभर प्रवास करून आपला देश, संस्कृती, समाज जाणण्याच्या हेतूने पायी प्रवास करणारा आधुनिक काळातील संन्यस्त वृत्तीचा तरुण नरेंद्र ‘स्वामी विवेकानंद’ झाल्यावर शिकागोच्या सर्वधर्म परिषदेत गेला.
निरपेक्षता
अगदी निरपेक्ष रहा, तसेच परतफेडीचीही आशा बाळगू नका. तुम्हाला जे काय द्यावयाचे असेल, ते द्या. ते तुम्हाला परत मिळेलच; पण त्याचा सध्या विचारही करू नका. कितीतरी पटीने, नव्हे सहस्रो पटींनी ते तुम्हाला परत मिळेल; पण त्यावरच तुमचे लक्ष असता कामा नये.
‘सत्यमेव जयते’
तुमच्या देशाला विरांची आवश्यकता आहे. वीर बना. पर्वताप्रमाणे दृढ व्हा ! तुमचा निश्चय कधीही ढळू देऊ नका.
दुर्बलता हे दुष्कृत्यांचे मूळ !
सर्व दुष्कृत्यांच्या मागे असणारी प्रेरक शक्ती, म्हणजे ही दुर्बलताच होय. ही दुर्बलताच सार्या स्वार्थपरतेचे मूळ होय. या दुर्बलतेमुळेच माणूस दुसर्यांची हानी करतो आणि त्यांचे अनिष्ट करतो.
भारतमातेला पुन्हा सिंहासनावर विराजमान करा !
बंधूनो, आपण सर्वजण सतत कार्य करूया, ही काही झोप घेण्याची वेळ नाही ! भारताचे भविष्य आपल्याच कार्यावर अवलंबून आहे. भारतमाता आपल्याकडे मोठ्या आशेने पहात आहे.
हिंदुत्व हेच ब्रह्मास्त्र !
‘हिंदुत्व’ हेच राष्ट्रीयत्व असून हिंदु समाज त्यापासून दूर गेला, तर हिंदुस्थानचे आणि हिंदूंचे अस्तित्व जगात रहाणार नाही, हे जाणा !
ईश्वराच्या संतानांची (मुलांची) सेवा म्हणजे ईश्वराची पूजा !
प्रत्येक पुरुष, प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक जीव म्हणजे ईश्वराचे एक एक रूप आहे, असे समजा. तुम्ही कुणाला साहाय्य करू शकत नाही, तुम्ही केवळ सेवा करू शकता. तुमच्या सद़्भाग्याने तुम्हाला संधी मिळाल्यास..
स्वामी विवेकानंद यांची बलाविषयीची शिकवण
जो प्रत्यक्ष कार्य करतो आणि ज्याचे हृदय सिंहासारखे आहे, त्याच्याचपाशी लक्ष्मी जात असते. मागे वळून पाहू नका, पुढे पाऊल टाका, पुढे पुढे चला ! अनंत बल, अनंत उत्साह, अनंत धैर्य आणि अनंत धीर हेच आपल्याला हवी आहेत. हे असतील, तरच महान कार्ये संपादिता येतील.
हिंदूंनी बलप्राप्तीसाठी करावयाची प्रार्थना !
आमची त्याला केवळ एवढीच प्रार्थना आहे की, हे प्रभो, तू ओजस्वरूप आहेस, आम्हाला ओजस्वी कर; तू वीर्यस्वरूप आहेस, आम्हाला वीर्यवान कर; तू बलस्वरूप आहेस, आम्हाला बलवान कर.’ – स्वामी विवेकानंद