भगवंताचा अखंडित भाव आणि महिमा

भगवंताचा अखंडित भाव आणि महिमा

‘परमेश्वर जणू साखरेच्या पर्वतासारखा आहे. एक लहानशी मुंगी त्यातून एक लहानसा कण घेऊन जाते. तिच्यापेक्षा थोडी मोठी मुंगी असली, तर ती त्याहून किंचित् मोठा कण घेऊन जाते…

भगवंताप्रती व्याकुळता कशी हवी ?

भगवंताप्रती व्याकुळता कशी हवी ?

‘नोकरी गेली म्हणजे, माणूस व्याकुळ होऊन एका कार्यालयातून दुसर्‍या कार्यालयात नोकरी शोधत भटकतो ! अशीच व्याकुळता भगवंताप्रती पाहिजे.’ ‘व्याकुळतेविना आध्यात्मिक जीवनात काहीच लाभत नाही.

परमेश्वराला साकार किंवा निराकार यांची मर्यादा नसणे !

परमेश्वराला साकार किंवा निराकार यांची मर्यादा नसणे !

‘परमेश्वर साकार आहे आणि निराकारही, तसेच तो साकार-निराकार दोन्हींच्या पलीकडेही आहे. ‘तो खरोखर काय आहे ?’, हे तोच जाणतो. भक्तांसाठी तो नाना रूपांनी आणि भावांनी प्रगट होत असतो. साकार किंवा निराकार यांतील कशानेच तो मर्यादित होत नाही.’

परमेश्वराच्या नामाचे आणि भावाचे महत्त्व !

परमेश्वराच्या नामाचे आणि भावाचे महत्त्व !

‘परमेश्वर एक; पण त्याची नामे आणि त्याचे भाव अनंत. त्यातील कुठलेही नाम आणि भाव यांच्या साहाय्याने त्याच्यापर्यंत पोचता येते. तुम्ही ज्या कोणत्या नामाने आणि भावाने त्याला आळवाल, त्यानेच तुम्हाला त्याचे दर्शन लाभेल.’ 

स्वामी विवेकानंद यांचे ईश्वरनिष्ठ ध्येय !

स्वामी विवेकानंद यांचे ईश्वरनिष्ठ ध्येय !

‘ज्यांच्या ठायी ईश्वराविषयी प्रामाणिक श्रद्धा आहे आणि जे कोणत्याही ऐहिक गोष्टीची पर्वा करत नाहीत’, अशा लोकांचा एक नवाच वर्ग मला येथे निर्माण करावयाचा आहे.’

बलाचा नेहमी विचार करणे हाच उपाय !

बलाचा नेहमी विचार करणे हाच उपाय !

तुम्हाला हवे असलेले सर्व साहाय्य आणि सर्व बल तुमच्यामध्येच आहे; म्हणून तुम्हीच स्वतःचे भवितव्य घडवा.

भारतात आपली उपनिषदे, पुराणे आणि धर्मशास्त्रे यांचा विस्तृत प्रमाणावर प्रचार व्हायला हवा !

भारतात आपली उपनिषदे, पुराणे आणि धर्मशास्त्रे यांचा विस्तृत प्रमाणावर प्रचार व्हायला हवा !

भारतात आधी येथे आध्यात्मिक विचारांचा पूर वाहू द्या. ज्याकडे आपण प्रथम लक्ष द्यावयास हवे असे जर कोणते कार्य असेल, तर ते हेच की, आपली उपनिषदे, पुराणे आणि धर्मशास्त्रे यांतच बंदिस्त होऊन पडलेली सर्वाेत्कृष्ट सत्ये

दानाच्या योगाने घेणारा नव्हे, तर देणाराच धन्य होत असतो

दानाच्या योगाने घेणारा नव्हे, तर देणाराच धन्य होत असतो

दोन पैसे हातात घेऊन आणि स्वतःला मोठे समजून एखाद्या भिकार्‍याला म्हणू नका, ‘अरे भिकार्‍या, घे दोन पैसे.’ उलटपक्षी तुमच्यासमोर तो गरीब माणूस उभा आहे, विषयी कृतज्ञता बाळगा; कारण त्याला दान दिल्याने..

स्वामी विवेकानंद म्हणतात !

स्वामी विवेकानंद म्हणतात !

आपल्या राष्ट्राच्या रक्तात एक भयंकर रोग शिरत आहे, तो म्हणजे प्रत्येक गोष्टीचा उपहास करणे आणि कोणत्याही गोष्टीचा गंभीरपणे विचार न करणे हा होय. हा रोग आपण दूर केलाच पाहिजे, तो आपण नष्ट केलाच पाहिजे.

ईश्वरावर श्रद्धा असू द्या !

ईश्वरावर श्रद्धा असू द्या !

कुणाकडून साहाय्याची अपेक्षा करू नका. सर्व प्रकारच्या मानवी साहाय्यापेक्षा ईश्वर अनंतपटीने मोठा नाही का ? पवित्र बना, शुद्ध व्हा, प्रभुवर श्रद्धा असू द्या ! त्याच्यावरच सर्वदा अवलंबून रहा, म्हणजे तुम्ही नेहमी उचित मार्गावर रहाल; मग कोणतीही गोष्ट तुमचा विरोध करू शकणार नाही.