स्थूल शरीर आणि सूक्ष्म मन यांच्या नियमनासाठी प्राणायामाचे महत्त्व !

स्वामी विवेकानंद

‘नियमित श्वासोच्छ्वासामुळे शरीर समतोल अवस्थेत रहाते आणि मग मनापर्यंत पोचणे सोपे जाते. यासाठी साधा प्राणायाम पुरेसा आहे. या मार्गाने आपण शरिरावर नियंत्रण मिळवतो आणि मग शरिरातील सूक्ष्म कार्याची जाणीव आपल्याला होऊ लागते. अधिकाधिक सूक्ष्म आणि अधिक आतील अशा कार्यांची जाणीव होता होता आपण मनापर्यंत पोचतो. अशा रीतीने नियमित आणि पद्धतशीर प्राणायामाने प्रथम स्थूल शरिरावर अन् नंतर सूक्ष्म शरिरावर नियंत्रण मिळवून मनाचे नियमन करता येते.’

– स्वामी विवेकानंद

(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)