स्वतःच्या खर्‍या स्वरूपासंबंधीचे अज्ञान हेच आपल्या भयाचे कारण ! 

स्वामी विवेकानंद

भय हेच अधःपतनाचे आणि पापाचे निश्चित कारण आहे. भयामुळेच दुःख प्राप्त होते, भयामुळेच मृत्यू ओढवतो. भयामुळेच सार्‍या वाईट गोष्टी उत्पन्न होतात आणि या भयाचे कारण कोणते आहे ? स्वतःच्या खर्‍या स्वरूपासंबंधीचे अज्ञान, हेच आपल्या भयाचे कारण होय. आपल्यापैकी प्रत्येक जण त्या राजाधिराज परमेश्वराचा वारसदार आहे.  (साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)