मानवसुलभ दोष आणि दुर्बलता नाहीशी होण्यासाठी अंतरंगातील दिव्यभाव वृद्धींगत होणे महत्त्वाचे !

मानवसुलभ दोष आणि दुर्बलता नाहीशी होण्यासाठी अंतरंगातील दिव्यभाव वृद्धींगत होणे महत्त्वाचे !

‘जेव्हा फुलापासून फळ धरायला लागते, तेव्हा फुलाच्या पाकळ्या आपोआपच गळून पडतात. त्याचप्रमाणे जेव्हा तुमच्या आतील दिव्यभाव वृद्धींगत होईल, तेव्हा तुमचे सर्व मानवसुलभ दोष आणि दुर्बलता आपोआप नाहीशी होतील.’

भगवंताकडे केवळ शुद्ध भक्ती मागावी !

भगवंताकडे केवळ शुद्ध भक्ती मागावी !

नारद म्हणाले, ‘रामा, मला तुमच्या पादपद्मी (चरणी) शुद्ध भक्ती द्या आणि मी तुमच्या ‘भुवनमोहिनी मायेने मुग्ध न व्हावे’, असे करा.’ श्रीराम म्हणाले, ‘तथास्तु, आणखी काही माग.’ नारद म्हणाले, ‘मला दुसरे काही नको. केवळ शुद्ध भक्ती हवी.’

माणसाचे चित्त भगवंताकडे राहिल्यास दिशाभूल होण्याची शक्यता न्यून असणे !

माणसाचे चित्त भगवंताकडे राहिल्यास दिशाभूल होण्याची शक्यता न्यून असणे !

‘जहाज कुठल्याही दिशेने जात असले, तरी होकायंत्राचा काटा नेहमी दक्षिण-उत्तर या दिशांकडेच असतो; म्हणून जहाजाची कधी दिशाभूल होत नाही. त्याचप्रमाणे माणसाचे चित्त जर भगवंताकडे लागलेले असेल, तर त्याला या भवसागरात मग्न होण्याची भीती रहात नाही.’

चित्त शुद्ध झाले, तर त्यात भगवद्‌भक्ती उत्पन्न होते !

चित्त शुद्ध झाले, तर त्यात भगवद्‌भक्ती उत्पन्न होते !

चित्त शुद्ध झाले, तर त्यात भगवद्भक्ती उत्पन्न होते. भगवंताचे नामस्मरण करून, देह आणि मन शुद्ध करून घ्या. त्याच्या पावन नामगुणगानाने जिव्हा पवित्र करून घ्या.

ईश्वरप्राप्तीसाठी साधना आणि सत्संग हवा !

ईश्वरप्राप्तीसाठी साधना आणि सत्संग हवा !

राजाजवळ जायचे असल्यास अगोदर द्वारपाल, पहारेदार, शिपाई, मंत्री इत्यादींना प्रसन्न करावे लागते, तसेच राजाधिराज परमेश्वराजवळ जायचे असल्यास ‘साधन म्हणजे भजन, भक्तसेवा आणि साधूसंग’, असे अनेक उपाय करावे लागतात.’

शक्ती कुणाला म्हणावे ?

शक्ती कुणाला म्हणावे ?

‘ब्रह्म आणि शक्ती अभिन्न आहेत. वस्तू एकच असते, जेव्हा ती निष्क्रीय असते. सृष्टी, स्थिती आणि प्रलय यांचे कार्य करत असते, तेव्हा आपण तिला शक्ती म्हणतो.’ 

१२ वर्षे अखंड ब्रह्मचर्य पाळण्याचे महत्त्व !

१२ वर्षे अखंड ब्रह्मचर्य पाळण्याचे महत्त्व !

‘१२ वर्षे अखंड ब्रह्मचर्य पाळता आले, म्हणजे माणसाच्या ठिकाणी असलेली मेधानाडी उघडते. तेव्हा त्याची बुद्धी अतीतीक्ष्ण, कुशाग्र आणि अत्यंत सूक्ष्म तत्त्वांची धारणा करण्यास समर्थ बनते…

जो परमेश्वराला प्राप्त करू इच्छितो, जो त्याच्यासाठी रडतो, त्याला तो लाभतो !  

जो परमेश्वराला प्राप्त करू इच्छितो, जो त्याच्यासाठी रडतो, त्याला तो लाभतो !  

‘मूल झाले नाही; म्हणून लोक अश्रूंचे लोट वहातात. धन मिळाले नाही; म्हणून केवढा शोक करत असतात; परंतु परमेश्वर लाभला नाही, म्हणून किती लोक दुःख करतात अन् रडतात ?

भगवंताचे यथार्थ स्वरूप अनंत असणे !

भगवंताचे यथार्थ स्वरूप अनंत असणे !

‘सूर्य पृथ्वीपेक्षा केवढा तरी मोठा असतो; पण दूर असल्यामुळे तो केवळ एका ताटाएवढा वाटतो. त्याचप्रमाणे भगवान अनंत आहेत; परंतु आपण त्यांच्यापासून पुष्कळ दूर असल्यामुळे त्यांचे यथार्थ स्वरूप आपल्याला कळत नाही.’

दुसर्‍यांसाठी सतत कार्यरत रहावे !

दुसर्‍यांसाठी सतत कार्यरत रहावे !

दुसर्‍यांसाठी केलेले अत्यंत लहानसे कामही अंतःस्थ शक्ती जागृत करते. दुसर्‍याच्या हिताचा अत्यंत थोडा विचार केल्यानेही हृदयात सिंहाचे बळ संचारते. माझे तुम्हा सर्वांवर उत्कट प्रेम आहे.