वाशी येथे २५ जुलै या दिवशी ‘कारगिल विजय दिवसा’चे आयोजन !

वाशी – वाशी येथे २५ जुलै या दिवशी कारगिल विजय दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीर डोग्रा समाज आणि सावरकर विचार मंच अन् कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. वाशीतील ‘कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय’ येथे सकाळी १०.३० वाजता होणार्‍या या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून कर्नल (निवृत्त) नरेशकुमार गोयल हे उपस्थित रहाणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. शुभदा नायक असणार आहेत. कारगिलच्या दुर्गम टेकड्यांवर अगम्य धैर्याने शत्रूचा पराभव करणार्‍या भारतीय वीरांनी दाखवलेल्या शौर्याची माहिती या वेळी दिली जाणार आहे.