रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात असलेल्या श्री सिद्धिविनायक मूर्तीतील चैतन्याची साधिकेला आलेली प्रचीती !
मिरवणुकीत पूर्णवेळ सहभागी होऊनही थकवा न जाणवणे आणि ‘श्री सिद्धिविनायकाने शक्ती प्रदान केली’, असे वाटणे
मिरवणुकीत पूर्णवेळ सहभागी होऊनही थकवा न जाणवणे आणि ‘श्री सिद्धिविनायकाने शक्ती प्रदान केली’, असे वाटणे
हे पठण श्री गणपति मंदिर येथे होईल. महिलांनी पठणासाठी येतांना आसन, पाण्याची बाटली आणि अथर्वशीर्ष पुस्तिका आणावी, असे आवाहन ‘ट्रस्ट’च्या वतीने करण्यात आले आहे.
वक्रतुण्ड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥
प्रबोधनासाठी देवतांचे मानवीकरण करण्यातून देवतांची विटंबना होते, हे हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळेच लक्षात येत नाही !
‘श्री गणेशचतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १ सहस्र पटींनी कार्यरत असते. या काळात केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा अधिक लाभ होतो.
अथर्वशीर्षाचे पठण केल्यास नकारात्मक शक्ती लोप पावून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. दूर्वा वाहून एक सहस्र आवर्तने केल्यास त्याचे फळ प्राप्त होते. ‘संकटनाशक स्त्रोत्राचे पठण केल्यास मनुष्यावरील संकट दूर होते’, असे पुराणात गणकऋषि यांनी अथर्वशीर्ष लिहितांना स्पष्ट केले आहे.
कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यापासून हिंदूंवर सातत्याने अत्याचार केले जात आहेत. काँग्रेसला सत्तेवर बसवणार्या हिंदूंना हे मान्य आहे का ?
आरंभी माझी चंद्रनाडी कार्यरत होती. दोन्ही नामजपांना आरंभ झाल्यावर माझी भावजागृती झाली. नामजपाची स्पंदने मला मूलाधारचक्रावर जाणवू लागली. तेव्हा माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली. . . माझे ध्यान लागले.
देवा श्री गणेशा, तू गणांचा अधिपती आहेस ! तू दुःखहर्ता आहे आणि सुखकर्ता आहेस. पूजेत तुला पहिला मान आहे; कारण तुझ्या स्मरणमात्रे दाही दिशा मोकळ्या होतात आणि पूजेतील ती ती देवता पूजेच्या ठिकाणी येऊ शकते !
‘गणपति बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’, हा जयघोषचालू झाल्यावर लक्षात येते की, गणरायाच्या आगमनाचा काळ जवळ आला आहे. आज श्री गणरायाचे वाजतगाजत घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपात शुभागमन होत आहे..