India Pakistan Relation : (म्हणे) ‘भारताने निवडणुकीत जम्मू-काश्मीरवर खोटे दावे करणे थांबवावे !’ – पाकचा जळफळाट
पाकव्याप्त काश्मीर आमचा भाग होता, आहे आणि राहील ! – राजनाथ सिंह
पाकव्याप्त काश्मीर आमचा भाग होता, आहे आणि राहील ! – राजनाथ सिंह
निर्भय क्षेपणास्त्र सैन्याला मिळाल्यानंतर चीन आणि पाक सीमेवर तैनात केले जाऊ शकते. हे क्षेपणास्त्र समुद्र आणि भूमी यांवरून डागता येते. हे क्षेपणास्त्र ६ मीटर लांब आणि ०.५२ मीटर रुंद आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डी.आर्.डी.ओ.चे अभिनंदन केले आहे.
भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ६ एप्रिल या दिवशी म्हटले की, भारत पाकिस्तानमधील आतंकवाद्यांचा शोध घेईल आणि त्यांना ठार करील. त्यांच्या या वक्तव्यावरून पाकिस्तानी माध्यमांमध्ये चर्चा होत आहे.
‘आतंकवाद्यांना पाकमध्ये घुसून मारणार’ या संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या विधानाने पाकला मिरच्या झोंबल्या !
भारताने स्वतःवर झालेल्या आक्रमणात गमावलेली स्वतःची भूमीही कधी परत घेतलेली नाही, हाही इतिहास आहे. तो पालटण्याचा भारताने प्रयत्न केला पाहिजे, असेच राष्ट्रभक्तांना वाटते !
प्राचीन सागरी साम्राज्य चोल राजवंशाच्या नावावरून नौदल युद्ध महाविद्यालयाच्या नव्या इमारतीला नाव दिले आहे. ही इमारत भारतीय नौदलाच्या आकांक्षा आणि सागरी उत्कृष्टता यांचा वारसा दर्शवते.
भारतीय नौदल इतके सशक्त झाले आहे की, आपण हिंदी महासागर आणि हिंद-प्रशांत क्षेत्रांत सुरक्षेच्या संदर्भात पहिल्या स्थानावर पोचलो आहोत.
युद्धनौका ‘आय.एन्.एस्. इंफाळ’ २६ डिसेंबर या दिवशी नौदलाच्या ताफ्यात भरती झाली. मुंबईतील नौदलाच्या तळावर झालेल्या या कार्यक्रमात ते बोलत होते.
एखाद्या देशासाठी समुद्री सामर्थ्य किती महत्त्वाचे असते, ते छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांत प्रथम जाणले. त्यांनीच भारतीय नौदलाचा पाया रचला. समुद्री शक्ती वाढवण्यासाठी त्यांनी काम केले. ‘समुद्रावर ज्याचे वर्चस्व तो सर्वशक्तीमान’ हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखले.
केंद्रशासनाने भारतीय सैन्यदलाला आणखी बळकट करण्यासाठी २.२३ लाख कोटी रुपयांच्या संरक्षण कराराला स्वीकृती दिली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील ‘संरक्षण अधिग्रहण परिषदे’ने हा निर्णय घेतला.