राष्ट्र आणि विश्व यांच्या उत्कर्षाकरता समर्पित व्हा !
‘साड्या, सोफासेट, टी.व्ही., गाडी यातच गुदमरून एक दिवस जीवनयात्रा संपवायची नाही. समाज आणि धर्म यांचे काही कर्तव्य आणि ऋण आहे.
‘साड्या, सोफासेट, टी.व्ही., गाडी यातच गुदमरून एक दिवस जीवनयात्रा संपवायची नाही. समाज आणि धर्म यांचे काही कर्तव्य आणि ऋण आहे.
संस्कृतीद्वेष्ट्यांचे सहस्रो ग्रंथ हिंदुस्थानात, जगातील ग्रंथालयांत आणि विद्यापिठांतून आहेत. आजही तेच शिकवले जातात, तरीसुद्धा आम्हा हिंदूजनांच्या स्वाभाविक अभिरूचीवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही.
धर्माचरणाची संधी आली की, आम्ही ती पुढे ढकलतो. ‘अन्य सगळ्या कामांना, फडतूस कर्मांनाही अग्रहक्क आणि धर्म अखेरचे काम’, असे करतो. वय निघून जाते. ‘म्हातारपणी धर्म करू’, असे म्हणतो, तेही घडत नाही. कसे घडेल ? कारण जीवनभर जे वळण पडले, ते एकाएकी म्हातारपणी पालटता कसे येईल ?’
असंख्य विचारवंत अन् शहाणे यांनी आर्य आक्रमण, आर्य-अनार्य, द्रविड संस्कृती, अशी अनेक थोतांडे उभी केली. याद्वारे आम्हा हिंदूंची सनातन धर्म आणि संस्कृती यांवरची श्रद्धाच मोडण्यासाठी कंबर बांधली. असा हा देश आणि आमची पुण्यपावन भारतभूमी निराशेने ग्रासून टाकली.’
‘आज भारतातला विशिष्टवर्ग स्वधर्माचा त्याग करण्यात भूषण मानतो . . . फास्टफूड यांचा धुमाकूळ इथे चालू आहे. हा भारत दुबळा आणि भेकड झाला आहे. ठार बुडाला आहे.’
वैदिक संस्कृतीची स्मृती होईल, अशा वस्तू आमच्याच राष्ट्रातून नामशेष झालेल्या दिसत आहेत. आम्ही वैदिक संस्कृतीच्या हवेत श्वास घ्यावा, ही उत्कटता असतांना कडव्या वैदिकाला धर्मजीवनही जगता येणे अशक्य झाले आहे.
देवदर्शनाकरता व्याकुळलेल्या चोखोबा भक्ताच्या भेटीला पांडुरंगच स्वतः मंदिराबाहेर येतात. शास्त्रविधीनुसार मंदिर मर्यादेच देव स्वतःच रक्षण करतात.
‘पृथ्वीच्या पाठीवरचा कुठल्याही भागातील कोणताही राजा कल्पनाही करू शकणार नाही, असे ते हिंदु सम्राट ! ज्या काळी ते सम्राट झाले, त्या काळी युरोप, अमेरिका अंधारात चाचपडत होती. रानावनातून भटकत होती.
‘धर्म आणि संस्कृती यांची प्रेरणाच मानवाला (पुरुष अन् स्त्री यांना) वासनामुक्त बनवू शकते. धर्म आणि संस्कृती नसांनसांतून वहाणारे तत्त्वज्ञानच मानवातील ‘पुरुषार्थ’ जागवू शकतो ! त्याची उदाहरणे पुढील लेखात दिली आहेत.