धर्माचरण अतीशीघ्र करण्‍याची आवश्‍यकता !

गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

‘उपासना, धर्माचरण अतिशीघ्र व्‍हायला हवे; पण गंमत अशी की, धर्माचरणाची संधी आली की, आम्‍ही ती पुढे ढकलतो. ‘अन्‍य सगळ्‍या कामांना, फडतूस कर्मांनाही अग्रहक्‍क आणि धर्म अखेरचे काम’, असे करतो. वय निघून जाते. ‘म्‍हातारपणी धर्म करू’, असे म्‍हणतो, तेही घडत नाही. कसे घडेल ? कारण जीवनभर जे वळण पडले, ते एकाएकी म्‍हातारपणी पालटता कसे येईल ?’

(साभार : मासिक ‘घनगर्जित’, फेब्रुवारी २०२२)