एकादशी माहात्म्य, व्रत आणि त्याची फलश्रुती !
‘एकादशी हे एकच व्रत असे आहे की, जे नेहमीप्रमाणे संकल्प वगैरे करून विधीपूर्वक घेण्याची आवश्यकता नसते; कारण हे व्रत जन्मतःच लागू होते. ते आमरण घडणे इष्ट आहे. एकादशी व्रत हे अन्य व्रतांस पायाभूत असल्यामुळे किमान पात्रता प्राप्त करून घेण्याची इच्छा असणार्यांनी एकादशी व्रत केलेच पाहिजे.