नागपूर येथील भूखंड प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती होती ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

नागपूर सुधार प्रन्यास प्राधिकरणमधील भूखंड प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची माहिती २९ मे २०१८ या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पत्राद्वारे नगरविकास प्रधान सचिवांना दिली होती, हे सिद्ध करणारे पत्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी २२ डिसेंबर या दिवशी विधानभवनात पत्रकारांना दाखवले.

दिशा सालियन हत्याप्रकरणाची एस् .आय.टी  चौकशी करण्याची गृहमंत्र्यांची घोषणा !

दिशा सालियन हिच्या मृत्यूविषयी कुणाकडे काही पुरावे असतील, तर ते सादर करावेत. दिशा हिच्या हत्येची चौकशी विशेष पोलीस पथकाद्वारे करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २२ डिसेंबर या दिवशी सभागृहात केली.

३ मासांत कोरोना साहाय्य निधीची रक्कम २ सहस्र ५०० रुपये करणार ! – मंगलप्रभात लोढा, महिला आणि बाल विकासमंत्री

कोरोना साहाय्य निधीची रक्कम २ सहस्र ५०० रुपयांपर्यंत वाढवण्यासाठी संबंधित सर्व विभागांची मान्यता प्राप्त झाली आहे. येत्या ३ मासांत ही रक्कम २ सहस्र ५०० रुपये करण्यात येईल, असे आश्वासन महिला आणि बाल विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी २२ डिसेंबर या दिवशी विधानसभेत दिले.

जिल्हा परिषदेच्या वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळत नसल्याची विधानसभेत लोकप्रतिनिधींनी मांडली समस्या !

गिरीश महाजन यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये वर्गखोल्या मोडकळीस आल्या आहेत, ‘शाळांमध्ये गळती होत आहे’ मात्र सध्या निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगितले.

दिशा सालियन मृत्यूच्या चौकशीवरून विधानसभेचे कामकाज ३ वेळा स्थगित !

अभिनेता सुशांत राजपूत यांनी भ्रमणभाषवरून दिशा सालियन हिला काही माहिती पाठवली होती. त्यामुळे तिची हत्या करण्यात आली का ? याविषयी पुनर्अन्वेषण करून या सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण करण्यात यावे.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याविषयी भाजपचे सदस्य गोपीचंद पडळकर यांच्याकडून अरेरावीची भाषा !

सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर तालिका सभापतींनी १५ मिनिटांसाठी विधान परिषदेचे कामकाज स्थगित केले.

फोन टॅपिंगप्रकरणात विरोधकांचा विधानसभेतून सभात्याग !

फोन टॅपिंग प्रकरणात अर्ध्या घंट्यांच्या चर्चेसाठी नियमानुसार १ घंटा आधी निवेदन दिले नसल्यामुळे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी चर्चा नाकारली. यामुळे विरोधकांनी सभात्याग केला.

मुंबईमध्ये किती उंदीर मारले ? याच्या चौकशीसाठी सरकारकडून समितीची स्थापना !

मुंबईतील ५ प्रभागांमध्ये उंदीर मारण्यासाठी ५ कोटी रुपये इतका निधी देण्यात आला; परंतु महानगरपालिकेचे कर्मचारी कधीही उंदीर मारतांना दिसलेले नाहीत.

२ मासांत चौकशी करून दोषी आढळणार्‍या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

कोयना धरणासाठी विस्थापित झालेल्यांना अजूनही जमिनीचे वाटप झालेले नाही. त्यातच सोलापूर येथील एका अधिकार्‍याने काही प्रकल्पग्रस्तांना एकाच जमिनीचे दोनदा वाटप केल्याचे समोर आले आहे.

अर्धा इंच जागाही कर्नाटकला देणार नाही !

सरकार सीमाभागातील ३६५ गावांतील मराठी भाषिकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. बोम्मई यांच्या उद्दाम वागण्यामुळे मराठी माणसाचे रक्त सळसळले आहे.