Goa Rental Vehicles Accidents : गोव्यात भाडेतत्त्वावर वाहने घेतांना वाहतूक नियमांच्या हमीपत्रावर स्वाक्षरी आवश्यक !

गोव्यात होणारे अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलीस विविध पातळीवर प्रयत्न करत आहेत. या अपघातांची नेमकी कारणे काय, याचाही अभ्यास केला जात आहे. हे हमीपत्र भरून घेण्याचे उत्तरदायित्व व्यावसायिकाकडे असेल.

Goa Schools Lottery Issue : शाळेसाठी निधी उभारण्यासाठी काढलेल्या सोडती (लॉटरीज) विद्यार्थ्यांना विकण्यास भाग पाडू नका !

असे शिक्षण खात्याला का सांगावे लागते ? असे कुठली शैक्षणिक संस्था करत असल्यास संबंधितांवर कारवाई व्हायला हवी !

महाराष्ट्र शासनाचे मराठी भाषा धोरण घोषित !

मराठी भाषा विभागाने १३ मार्च या दिवशी राज्याचे मराठी भाषा धोरण घोषित केले. यामध्ये येत्या २५ वर्षांत मराठीला राष्ट्रीय आणि वैश्विक भाषा म्हणून विकसित करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले.

१५ मार्चपासून पुढील दीड मास श्री विठ्ठलाचे चरणस्पर्श दर्शन बंद रहाणार ! – ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर

सध्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे संवर्धन आणि सुशोभीकरणाचे काम चालू आहे. यासाठी राज्य सरकारने ७३ कोटी रुपये संमत केले आहेत.

सातारा जिल्ह्यातील मंदिर चोरीच्या घटनांचे अन्वेषण प्राधान्याने करून चोरांवर कठोर कायदेशीर कारवाई करा !

चोरांना अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच हे सर्व खटले द्रुतगती (फास्टट्रॅक) न्यायालयात चालवण्यात यावेत, अशी मागणी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

मुंबईतील ८ ब्रिटीशकालीन रेल्वेस्थानकांचे नामांतर !

१३ मार्च या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये मुंबईतील ८ ब्रिटीशकालीन रेल्वेस्थानकांचे नामांतर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या मंत्रीमंडळाच्या बैठकीत एकूण २८ निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

अहमदनगर जिल्ह्याच्या ‘अहिल्यानगर’ नामकरणाला मंत्रीमंडळाची मान्यता !

अहमदनगर शहर आणि जिल्हा यांचे नामकरण ‘अहिल्यानगर’ असे करण्यास मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. १३ मार्चला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. याविषयी अनेक लोकप्रतिनिधी, नागरिक आणि संघटना यांनी राज्यशासनाकडे मागणी केली होती.

पुणे येथील ‘ओला’ आणि ‘उबेर’ यांचा परवाना रहित !

‘ऑनलाईन’ प्रवासी वाहतूक क्षेत्रातील ‘ओला’ आणि ‘उबर’ या आस्थापनांना प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने अनुमती नाकारली आहे. राज्य सरकारचे ‘मोटार वाहन समुच्चय’ (अ‍ॅग्रीगेटर) धोरण नसल्याने या आस्थापनांनी केंद्र सरकारच्या धोरणांतर्गत हे अर्ज केले होते.

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : मंत्रालय स्वच्छ आणि नीटनेटके ठेवण्यासाठी राज्यशासनाने आदेश काढला !

दैनिक ‘सनातन प्रभात’मधील वृत्त आणि सुराज्य अभियानाची तक्रार यांवर कार्यवाही करत राज्यशासनाने ११ मार्च या दिवशी मंत्रालयाच्या स्वच्छतेसाठी शासन आदेश काढला आहे.

चिकलठाणा (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) येथे हनुमात मंदिरात आरती चालू असतांना ६० धर्मांध मुसलमानांचा हैदोस !

धर्मांधांच्या अशा घटनांविषयी काँग्रेस, साम्यवादी पक्ष, समाजवादी पक्ष, बसप, पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी किंवा इस्लामी संघटना तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !