मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज ! – जिल्हाधिकारी

७ मे या दिवशी कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात होत असलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने होणार्‍या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज आहे. दोन्ही मतदारसंघात मिळून ३ सहस्र ९८६ मतदान केंद्रांचा वापर करण्यात येणार आहे.

मे महिन्याच्या शेवटपर्यंत वारकर्‍यांसाठी चरण दर्शनाची शक्यता नाही : मंदिर संवर्धनाचे काम अद्याप अपूर्ण !

राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासाठी राज्यशासनाने ७३ कोटी रुपयांचा आराखडा संमत केला आहे. या निधीतून मंदिर समूह आणि परिवार देवता यांच्या मंदिरांचे जतन केले जात आहे.

कोकणचा विकास पर्यटनातून शक्य ! –  राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

कारसेवकांना गोळ्या घालून ठार मारले आणि त्यांची प्रेते शरयू नदीत फेकून दिली. तो बाबर आणि त्याला सांभाळणारे आजही आपल्याकडे आहेत, हे दुर्दैव आहे.

दबावतंत्र असते तर संजय राऊतही भाजपमध्ये आले असते ! – विनोद तावडे, राष्ट्रीय सरचिटणीस, भाजप

पुणे येथे पत्रकार संघाच्या वतीने त्यांच्याशी वार्तालाप आयोजित करण्यात आला होता, या वेळी ते बोलत होते. विनोद तावडे पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे सुडाचे राजकारण करत नाहीत, अन्यथा ते मुख्यमंत्री झाले असते.

कठोर नियमांमुळे पुणे शहरातील ३५ हून अधिक रुग्णालये बंद !

नियम जनतेच्या सोयीसाठी कि गैरसोयीसाठी ? असा प्रश्न निर्माण करणारी घटना ! असे नियम कुणी बनवले हे पहाणे आवश्यक !

सोंटू जैन याची मालमत्ता मोजण्यासाठी ताबा घेण्यापूर्वी ४० कोटी रुपये जमा करा !

गेल्या वर्षी जुलै मध्ये नागपूर पोलिसांनी गोंदिया येथील कथित बुकी सोंटू जैन याच्या घरी धाड टाकून १७ कोटी रोख आणि २ कोटी ४४ लाख रुपयांचे सोने-चांदी जप्त केली होती. 

कर्करोगाशी लढणार्‍या पुणे येथील ‘दिव्यांश’ची कहाणी ‘ब्लेझ : एका पुत्राची अग्नीपरीक्षा’ या पुस्तकाने प्रकाशित !

‘‘दिव्यांशच्या जगण्याची लढाई ही केवळ एकट्या दिव्यांशची नव्हती, तर ती संपूर्ण कुटुंबाची होती. पारंपरिक उपचारांच्या पुढे जाऊन या कुटुंबाने दिव्यांशच्या दीर्घायुष्यासाठी प्रयत्न केले.

नेहा हिरेमठच्या मारेकर्‍याला फाशी झाली पाहिजे !

पालकांनी स्वत:च्या मुलींशी योग्य संवाद ठेवणे, सजग असणे आणि युवतींनीही स्वत:ची मैत्रिण संकटात असल्याचे लक्षात आल्यास तिला सावध करणे आवश्यक आहे.

केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी हटवली; मात्र मोठे निर्यात शुल्क लागू केल्याने शेतकरी अप्रसन्न !  

केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील बंदी हटवली आहे; मात्र दुसर्‍या बाजूला ५५० डॉलर प्रतिमेट्रिक टन किमान निर्यात शुल्क लागू करण्यात आले आहे, त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये अप्रसन्नता आहे.

श्री क्षेत्र भीमाशंकर येथे महारुद्र स्वाहाकार आणि अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात साजरा !

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणार्‍या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी ४ दिवसांचा महारुद्र स्वाहाकार आणि अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रम उत्साहात झाला.