आधुनिक वैद्यांची ग्रामीण भागातील रुग्‍णसेवा ?

आधुनिक वैद्यांना ग्रामीण भागात जाण्‍याचे महत्त्व सांगणे आणि ते का जात नाहीत ? याचा अभ्‍यास करून ती कारणे दूर करणे, याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे. काही कालावधीसाठीही ग्रामीण भागात जाण्‍यास नाकारणारे आधुनिक वैद्य, हे मिळवलेल्‍या पदवीला खर्‍या अर्थाने न्‍याय देत आहेत का ? हे महत्त्वाचे !

नद्यांचे प्रदूषण ?

नद्यांमध्‍ये असलेल्‍या गाळामुळे त्‍यांची वहन, साठवण क्षमता न्‍यून होणे, असे गंभीर दुष्‍परिणाम होत असल्‍याचे दिसून येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर नदीच्‍या समस्‍यांचा अभ्‍यास करून त्‍या सोडवण्‍यासाठी ‘चला जाणूया नदीला’, या अभियानाला प्रारंभ करण्‍यात आला आहे.

लाच घेणार्‍यांची पाठराखण का ?

देशातील भ्रष्‍टाचार संपवण्‍यासाठी प्रत्‍येकाने आपली मानसिकता पालटून ‘लाच घेणारा व्‍यक्‍ती आणि त्‍याचे कुटुंबीय यांनाच त्रास होईल’, असा विचार केल्‍यास प्रत्‍येक व्‍यक्‍ती कोणत्‍या ना कोणत्‍या कारणाने लाच घेण्‍यापासून लांब राहील, हे नक्‍की !

काँग्रेसचा ब्राह्मणद्वेष !

ब्रिटीश भारतात आल्‍यानंतर देशाला स्‍वातंत्र्य मिळवून देण्‍यासाठी वासुदेव बळवंत फडके, टिळक, आगरकर, सावरकर आदींनी योगदान दिले; मात्र ब्राह्मणद्वेषाचा चष्‍मा घालून इतिहासात चुका केल्‍या म्‍हणून आता ब्राह्मणांना लक्ष्य करण्‍याचा उद्योग काँग्रेसने बंद करायला हवा, असेच सर्वांना वाटते.

शुद्ध हवा कधी मिळणार ?

प्रशासनाने इच्‍छाशक्‍ती वाढवून शहरातील प्रदूषण वाढण्‍यामागील नेमकी कारणे शोधून त्‍यावर कार्यवाही करणे, प्रदूषकांच्‍या स्रोतांवर काम करणे अशा उपाययोजना युद्धस्‍तरावर केल्‍या, तर हवेची  गुणवत्ता सुधारणे अशक्‍य नाही !

निसर्ग आणि मनुष्य !

सरकारने येणार्‍या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन निसर्गदेवता, पंचमहाभूते यांना शरण जाऊन नैसर्गिक संकटांना तोंड देण्यासाठी सज्ज कसे रहायला हवे ? हेही जनतेला शिकवणे आवश्यक आहे.

राष्‍ट्रीय महिला आयोगाचे दायित्‍व काय ?

उर्फी भर रस्‍त्‍यात करत असलेले शरिराचे नग्‍न प्रदर्शन हे लहान मुले आणि मुली यांच्‍या मनावरही घातक परिणाम करणारे आहे. अजाणत्‍या वयात नको त्‍या गोष्‍टी समोर आल्‍याने बालमनावर होणारा गंभीर परिणाम कोण आणि कसा घालवणार ? हे चिंताजनक आहे.

‘शालेय पोषण आहार योजना’ कुणासाठी ?

प्रत्यक्षात ‘शालेय पोषण आहार’ योजना ३ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांना चांगला आहार मिळावा, यासाठी राज्यात २२ नोव्हेंबर १९९५ पासून राबवण्यात येत आहे. २६ वर्षे उलटून गेल्यानंतरही मुलांना उत्कृष्ट प्रतीचा आहार मिळू शकत नाही, ही शोकांतिकाच आहे.

शेतकरी आणि कामगार यांना वाली कोण ?

मधुकर सहकारी साखर कारखान्याप्रमाणे देशामध्ये अशाच प्रकारच्या समस्या अनेक ठिकाणी आहेत. अशा समस्या सुटण्यासाठी देशातील भ्रष्टाचार आणि घोटाळा यांची बजबजपुरी संपणे आवश्यक आहे. यासाठी शासनकर्त्यांनी इच्छाशक्ती वाढवून भ्रष्टाचार करणार्‍यांना कठोर शिक्षा करावी, हीच अपेक्षा !

‘संस्कार’ महत्त्वाचे !

हिंदु विवाह संस्कार हा सर्वांच्याच हिताचा असून विवाहात अनेक प्रकारचे विधी, प्रत्येक विधीचे वेगवेगळे मंत्र आहेत. विवाहाच्या मंत्रांचा अर्थ नीट समजून घेतला, तर ‘या प्रकारानेच विवाह व्हावा’, असे प्रत्येक तरुण-तरुणीला वाटेल. सर्व संस्कार यथाविधी केल्याने देवतांची कृपा होते.