अयोध्येत तात्पुरत्या ‘बुलेटप्रुफ’ मंदिरात रामललाची स्थापना

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अयोध्येतील रामजन्मभूमीवर तब्बल २७ वर्षे एका तंबूमध्ये असणार्‍या रामललाला येथून जवळच एका तात्पुरत्या ‘बुलेटप्रुफ’ मंदिरात विधीवत् स्थापित करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहाटे मंत्रोच्चाराच्या घोषात येथे विधीवत पूजा करून चांदीच्या सिंहासनावर रामललाची स्थापना केली.

देहलीत संचारबंदी केल्यामुळे प्रदूषणात कमालीची घट

कोरोनाचा असाही परिणाम ! आता देहलीतील नागरिक काही दिवस तरी स्वच्छ हवा अनुभवतील !

देशभरात घरून काम केले जात असल्यामुळे मंदावला इंटरनेटचा वेग !

अनेक जण ‘ऑनलाइन वेबसीरिज्’ आणि ‘ऑनलाइन’ खेळ खेळत असल्याचे उघड : घरून काम करण्याचे प्राधान्य अग्रक्रमात असतांना सरकारने ‘ऑनलाइन वेबसीरिज्’ आणि ‘ऑनलाइन’ खेळ यांवर बंदी आणून कामे पूर्ण होण्यासाठी इंटरनेटला गती उपलब्ध करून द्यावी, हीच राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !

नागोठणे (जिल्हा रायगड) येथील सनातनचे ६१ वे संत पू. अनंत (तात्या) पाटील यांचा देहत्याग !

नागोठणे (जिल्हा रायगड) येथील सनातनचे ६१ वे संत पू. अनंत (तात्या) रामचंद्र पाटील (वय ८७ वर्षे) यांनी २५ मार्च २०२० या दिवशी दुपारी ३.३० वाजता देहत्याग केला. गेले काही मास ते वाकण (जिल्हा रायगड) येथे त्यांच्या मुलाकडे वास्तव्यास होते.

वृत्तपत्रांना आडकाठी न करता वाचकांपर्यंत पोचवण्यासाठी साहाय्य करा ! – केंद्रशासनाचे निर्देश

संपूर्ण देशात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संचारबंदी आणि इतर कडक निर्बंध लादले जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर योग्य आणि आवश्यक माहिती नागरिकांपर्यंत पोचण्यासाठी सर्व वृत्तसंस्था, मुद्रित (वृत्तपत्र) आणि दूरचित्रवाहिन्या यांमध्ये काम करणार्‍या संस्था अन् तेथील कर्मचारी यांना कोणतीही…

‘लॉकडाऊन’चे पालन न करणार्‍यांच्या विरोधात उत्तरप्रदेश पोलिसांकडून सामाजिकदृष्ट्या लाज वाटेल अशी कारवाई

देशातील विविध राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दळणवळणबंदी घोषित करण्यात आली आहे. असे असतांना अनेक नागरिक शासनाने दिलेल्या सूचना धुडकावून लावत रस्त्यावर फिरत आहेत. यावर उत्तरप्रदेश पोलिसांकडून ‘लॉकडाऊन’चे पालन न करणार्‍यांच्या विरोधात सामाजिकदृष्ट्या लाज वाटेल

घरीच अलगीकरण करण्यात आलेल्यांनी बाहेर पडल्यास त्यांना ३ मासांच्या कारावासाची शिक्षा होणार

येथील कोरोनाच्या संशयित रुग्णांच्या घरांवर लाल रंगाचे स्टिकर लावण्यात येत असून त्याद्वारे सतर्क रहाण्याचा संदेश दिला जात आहे.

सायखेडा (नाशिक) येथे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जनजागृती करणार्‍या पोलिसांवरच २ तरुणांचे आक्रमण

येथे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘गर्दी करू नका, एकत्र येऊ नका’, असे आवाहन करत असलेल्या पोलिसांवरच २ तरुणांनी आक्रमण केले. त्रिमूर्ती चौकात पोलिसांनी तरुणांच्या जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांतील अमोल कुटे आणि संतोष कुटे यांनी पोलिसांशी हुज्जत घालत त्यांना शिवीगाळ केली.

सहकार्य न करणार्‍यांवर लाठीचा उपयोग करण्यात येईल ! – अनिल देशमुख, गृहमंत्री

संचारबंदीला ९० टक्के जनतेचे सहकार्य मिळाले आहे; मात्र काही लोकांना परिस्थितीचे गांभीर्य नाही. जे सहकार्य करणार नाहीत, त्यांच्यावर लाठीचा उपयोग करण्यात येईल, अशी चेतावणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

मुसलमानांनी दळणवळण टाळून घरातच नमाजपठण करावे !

सध्याची स्थिती पहाता मशिदीमध्ये केवळ ४-५ जणांनीच जाऊन नमाजपठण करावे, तर उर्वरित मुसलमानांनी घरामध्येच नमाजपठण करावे, असे आवाहन बिहारमधील मुसलमानांच्या काही धार्मिक संघटनांनी केले आहे.