दुचाकीवर बसल्या बसल्या फाटक उघडणे किंवा बंद करणे टाळावे
कधीतरी अचानक मान, पाठ, कटी (कंबर) किंवा खांदा यांचे दुखणे किंवा लचक भरणे यांना हे कारण ठरू शकते. तसे होऊ नये, यासाठी (कितीही घाई असली, तरी) दुचाकीवरून उतरून फाटक उघडावे किंवा बंद करावे.
कधीतरी अचानक मान, पाठ, कटी (कंबर) किंवा खांदा यांचे दुखणे किंवा लचक भरणे यांना हे कारण ठरू शकते. तसे होऊ नये, यासाठी (कितीही घाई असली, तरी) दुचाकीवरून उतरून फाटक उघडावे किंवा बंद करावे.
कफयुक्त किंवा कोरड्या खोकल्यामध्ये दिवसातून ४ – ५ वेळा चिमूटभर सनातन पिप्पली (पिंपळी) चूर्ण चघळावे. त्यामुळे खोकला थांबतो. हा उपचार अधिकाधिक ३ दिवस करावा.
‘दिवसभरात शरिराची जी झीज होते, ती रात्रीच्या झोपेने भरून येत असते. त्यामुळे रात्री सलग आणि पुरेशी झोप घेणे आवश्यक असते.
तुम्ही दिवसभरात अनेक वेळा चहा घेत असाल, तर दिवसातून सायंकाळी अमुक वाजता एकदाच चहा घेण्याचे ठरवावे. त्यानंतर दिवसभरात चहा घेण्याच्या प्रलोभनापासून वाचण्यासाठी दिवसातून ५ वेळा, तसेच प्रत्येक वेळेला ५ वेळा पुढील स्वयंसूचना वाचावी……
दुपारी जेवून अधिक वेळ झोपल्यास शरिराचा रक्तप्रवाह हातापायांकडे अधिक प्रमाणात वळतो आणि पोटाकडे जाणारा रक्तप्रवाह काही अंशी न्यून होतो. त्यामुळे अन्नपचन नीट होत नाही. त्यासाठी . . .
आयुर्वेदानुसार ‘स्वतःच्या प्रकृतीला मानवेल, असे तहान लागेल तेव्हा आणि तहान भागेल तेवढेच आवश्यक पाणी ऋतूनुसार प्यावे.’
‘रात्री झोपतांना भ्रमणभाष (मोबाईल) पहाणे’, हे आजकाल शांत झोप न लागण्याचे एक मुख्य कारण झाले आहे. त्यामुळे रात्री झोपण्याच्या न्यूनतम १ घंटा आधीपासून भ्रमणभाषचा वापर टाळावा.’
प्रतिदिन सकाळी उठल्यावर, तसेच रात्री झोपण्यापूर्वी दंतमंजनाने दात घासल्याने तोंडातील विकृत कफ दूर होतो, तसेच दातांना बळकटी येते. दात किडणे थांबून दातांचे आरोग्य सुधारते.
थंडी पडणे न्यून झाल्यावर सकाळी आणि सायंकाळी सनातन शुंठी चूर्ण मधात किंवा कोमट पाण्यात मिसळून घ्यावे किंवा चहा किंवा कशाय यांमध्ये घालून उकळून प्यावे. असे केल्याने कफाचे विकार आटोक्यात रहाण्यास साहाय्य होते.
सध्या अनेक लोक वारंवार सर्दी, खोकला होणे किंवा शिंका येणे यांमुळे त्रासलेले आहेत. असे होण्यामागे एक सर्वसाधारण कृती कारण ठरू शकते आणि ती बहुधा दुर्लक्षित रहाते. ही कृती म्हणजे सध्या ‘थंड ऋतु असूनही प्रतिदिन शिरःस्नान (डोक्यावरुन अंघोळ) करणे’.