श्रीरामपूर (जिल्हा अहिल्यानगर) शहर पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये धर्मांधांचे २ हिंदूंवर प्राणघातक आक्रमण !

गायी असलेले वाहन पोलीस ठाण्यात आणल्यामुळे आक्रमण !

श्रीरामपूर (जिल्हा अहिल्यानगर) – पशूवधगृहाकडे गायी घेऊन जाणारे वाहन पोलिसांनी येथे पकडले. ते वाहन घटनास्थळावरून पोलीस ठाण्यापर्यंत आणण्यास पोलिसांना साहाय्य केल्याने धर्मांधांच्या गटाने निर्मळ आणि मापारी नावाच्या २ हिंदूंवर प्राणघातक आक्रमण केले. ही घटना श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये १६ ऑगस्ट या दिवशी घडली. त्यानंतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये गर्दी केली. पोलिसांनी धर्मांधांच्या गटातील २ जणांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध चालू आहे. या प्रकरणी निर्मळ यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात धर्मांधांविरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे.

श्रीरामपूर शहर पोलिसांनी आर्.बी.एन्.बी. महाविद्यालयाकडे जाणार्‍या बोगद्याजवळ गायी घेऊन जाणारे टाटा आस्थापनाचे एक वाहन अडवले होते. घटनास्थळी जमाव जमला होता. तेव्हा तेथील पोलिसांनी ‘हे वाहन कुणाला चालवता येते का?’, असे विचारल्यानंतर निर्मळ यांनी होकार दिला. त्यांनी त्यांचा मित्र मापारी यांच्यासह ते वाहन पोलीस ठाण्यात आणले. ते दोघेजण पोलीस ठाण्याच्या आवारात असतांनाच वसीम कुरेशी, शाहीद कुरेशी, बुंदी कुरेशी, शाहरुख कुरेशी, तौफिक कुरेशी, मोहसीन कुरेशी, अदनान कुरेशी, सदाम कुरेशी, इरफान शेख, शाहरुख कुरेशी यांनी निर्मळ यांना ‘तू गाडी का चालवत आणली ? तुला जिवंत सोडणार नाही,’ असे म्हणत निर्मळ यांच्यावर प्राणघातक आक्रमण केले. वरील सर्व धर्मांधांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

पोलीस ठाण्याच्या आवारातही आक्रमण करण्यापर्यंत धर्मांधांची मजल जाते, हे पोलिसांचा काहीच धाक उरला नसल्याचे लक्षण ! पोलिसांना हे लज्जास्पद ! धर्मांधांच्या वाढत्या मुजोरीला आळा घालण्यासाठी पोलीस सक्षम कधी होणार ?