स्वामी विवेकानंद यांची शिकवण

मित्रा ! केवळ आत्माच सर्वांहून श्रेष्ठ आहे, जडद्रव्य नव्हे. स्वतःला देहच समजणारे अज्ञानी लोक ‘आम्ही दुर्बल आहोत, आम्ही दुर्बल आहोत’, अशा करुण स्वरात आक्रोश करत असतात. आपल्या देशाला आज आवश्यकता आहे साहसाची आणि त्यासमवेतच वैज्ञानिक प्रतिभेची ! आज आपल्याला आवश्यकता आहे असीम साहसाची, प्रचंड शक्तीची आणि अदम्य उत्साहाची ! बायकीपणा आणि नामर्दपणा मुळीच उपयोगाचा नाही. जो प्रत्यक्ष कार्य करतो आणि ज्याचे हृदय सिंहासारखे आहे, त्याच्याचपाशी लक्ष्मी जात असते. मागे वळून पाहू नका, पुढे पाऊल टाका, पुढे पुढे चला ! अनंत बल, अनंत उत्साह, अनंत धैर्य आणि अनंत धीर हेच आपल्याला हवे आहेत. हे असतील, तरच महान कार्ये संपादिता येतील.
(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
मोठेपणा मिरवण्याची प्रवृत्ती, गटबाजी आणि मत्सर यांचा त्याग करणे महत्त्वाचे !
रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्यांसाठी गीता !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
भारतियांचे राष्ट्रीय महापातक !
निष्क्रीयता टाळा !