बागीलगे (जिल्हा कोल्हापूर) येथील ग्रामस्थांचा स्तुत्य निर्णय !

कोल्हापूर – विवाह सोहळ्यात अलीकडच्या काळात नवरा-नवरी एकमेकांना पुष्पहार घालत असतांना त्यांना उचलण्याची अयोग्य कृती केली जात आहे. विवाहविधी करतांना अशी कृती केल्यास संबंधितांना २५ सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्याचा स्तुत्य निर्णय बागीलगे (तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर) येथील ग्रामस्थांनी घेतला आहे. या गावात विविध कार्यक्रमांसाठी मोठ्या आवाजात ध्वनीक्षेपक यंत्रणा लावण्यास बंदी आहे. (आज विवाह विधीत अनेक अयोग्य कृतींचा शिरकाव झाला असून वधू-वरांनी एकमेकांना माळ घालतांना त्यांना उचलण्याची अयोग्य कृती सगळीकडे होतांना दिसते. यामुळे विवाह कार्यातील पावित्र्य जपण्यासाठी योग्य तो निर्णय घेणार्या बागीलगे ग्रामस्थांचा निर्णय कौतुकास्पद आहे ! राज्यातील इतर ग्रामपंचायतींनी अशा प्रकारे योग्य कृती करण्यासाठी पुढाकार घेतल्यास हिंदु संस्कृतीचे जतन निश्चित होईल ! – संपादक)
येथील विवाहसोहळे हे मुख्य करून रवळनाथ मंदिरासमोर असलेल्या रिकाम्या जागेत केले जातात. सोहळ्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय ग्रामपंचायतीच्या वतीने केली जाते. भोजन हे स्थानिक आचारी सेवाभावी वृत्तीने करतात.
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !