सनातनी असल्याचे भासवून हिंदु मुलींना जाळ्यात ओढणारी जिहाद्यांची टोळी कार्यरत !

कानपूर (उत्तरप्रदेश) येथील घटना !

कानपूर (उत्तरप्रदेश) – राज्याची औद्योगिक राजधानी असलेले कानपूर हे शहर हिंदूंच्या धर्मांतराचे केंद्र बनले आहे. येथे काही जिहाद्यांची टोळी भोळ्याभाबड्या आणि गरीब हिंदु मुलींचे लैंगिक शोषण करून त्यांचे धर्मांतर करत असल्याचे समोर आले आहे. येथील काकडेदेव पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा नोंदवण्यात आला असून फैज याला अटक करण्यात आली आहे. शहरातील ६ हून अधिक जिहादी मुसलमान या षड्यंत्रात गुंतले असून यात दोन-तीन महिलांचाही समावेश आहे. शानू, लफ्फाज आणि शानू पिस्टल यांच्यासह अनेक जण यामध्ये गुंतले असून फैजच्या अटकेपूर्वी पोलिसांनी शानू पिस्टल याला अटक केली आहे.

याविषयी माहिती देतांना पोलीस उपायुक्त राम सेवक गौतम म्हणाले की,

१. पोलिसांच्या काही पथकांनी कानपूरमधील पूर्व विभागातील काही हॉटेल्सवर धाडी घातल्या; मात्र त्यांना यश आले नाही. एका पीडितेच्या धर्मांतराच्या प्रकरणात तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

२. सध्या फैजसमवेत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहाणारी (विवाह न करता एकत्र रहाणारी) अन्य एक तरुणी फरार आहे. या प्रकरणी मानवी तस्करीची शक्यताही वर्तवली गेली आहे. या परिसरात अशीच एक टोळी सक्रीय होती, जी बलपूर्वक आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत मुलींना परदेशात पाठवायची.

स्वतःला ‘सनातनी’ म्हणून दाखवत महागड्या गाड्यांसमवेतची छायाचित्रे प्रसारित करून हिंदु मुलींना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न !

पोलीस उपायुक्त राम सेवक गौतम यांनी सांगितले की, या टोळीने सर्व सामाजिक माध्यमांना स्वत:चे शस्त्र बनवले आहे. इन्स्टाग्राम, फेसबूक आदींवर हे लोक महागड्या गाड्या आणि सोन्याचे दागिने घातलेली छायाचित्रे प्रसारित करतात अन् स्वतःला ‘सनातनी’ म्हणवून घेतात. यानंतर नोकरी आणि साहाय्य करण्याच्या नावाखाली ते मुलींना आमिष दाखवून त्यांचे शारीरिक शोषण करून व्हिडिओ बनवतात. ते काही दिवस एकत्र घालवतात आणि विवाहाचे नाटक करतात. यानंतर त्यांना धर्मांतर करण्यास बाध्य केले जाते. याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी पोलीस उपायुक्त राम सेवक गौतम यांना ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्यांनी याविषयी अधिक माहिती देण्याचे टाळले.

संपादकीय भूमिका

धर्मांतराचा गड बनलेले कानपूर शहर ! अल्पसंख्यांक म्हणवणारे ख्रिस्ती आणि मुसलमान येथील असाहाय्य हिंदूंना विविध आमिषे दाखवून त्यांचे धर्मांतर करत आहेत. यासाठी उत्तरप्रदेश पोलिसांनी धर्मांतरविरोधी कायद्याचा वापर करून कठोर कारवाई केली पाहिजे !