आपल्याला सावध करतील आणि हक्काने रागावून सुधारतील, अशा संतांच्या चरणी जायला हवे !

‘आपल्याला सावध करतील आणि हक्काने रागावून सुधारतील, अशा संतांच्या चरणी गेले पाहिजे. स्तुती करणारे, तर पुष्कळ मिळतात; परंतु ‘तुम्ही महान बनावे’, या हेतूने सत्य ऐकवून ते परमात्म्याकडे आकर्षित करणारे आणि ईश्वराच्या साक्षात्काराच्या मार्गावर घेऊन जाणारे महापुरुष तर विरळाच असतात. अशा महापुरुषांची संगत आदराने आणि प्रयत्नपूर्वक केली पाहिजे.’

(साभार : ग्रंथ ‘सदा दिवाळी’)