ज्याने आपले समाधान आणि सुख भंग पावत नाही, अशा परममूल्यवान आंतरिक रत्नालाच परमार्थात ‘वस्तू’ म्हटलेले असणे

बाहेरील वस्तू मिळो वा न मिळो, ती वस्तू मिळाल्यानंतरही तिची अवस्था कशीही असली, तरी आपले समाधान आणि सुख भंग पावत नाही, अशी अमोलिक अंतर्वस्तू विचारांच्या मुळाच्या शोधातून प्राप्त होते. या परममूल्यवान आंतरिक रत्नालाच परमार्थात ‘वस्तू’ म्हटलेले आहे.

– स्वामी विद्यानंद (साभार : ग्रंथ ‘चिंतनधारा’)