
रत्नागिरी – महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)(३) वर्ष १९५१ चा कायदा २२ वा नुसार ४ एप्रिल २०२४ ला ००.०१ वाजल्यापासून ते १८ एप्रिल २०२४ चे २४.०० वाजेपर्यत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)(३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी लागू केला आहे. १२ मार्च ते ११ एप्रिल या कालावधीत मुस्लिम धर्मीयांचा रमझान सण, तसेच ९ एप्रिल या दिवशी गुढीपाडवा, १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, तसेच १७ एप्रिल या दिवशी श्रीरामनवमी हे सण साजरे होणार आहेत.
१६ मार्चपासून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. विविध राजकीय पक्ष, विविध संघटना, तसेच वेगवेगळ्या घटकांतील नागरिकांकडून त्यांच्या विविध मागण्यांकरता आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते, तसेच जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग मुंबई-गोवा क्र. ६६ चे काम पूर्ण न झाल्याचे निषेधार्थ आंदोलनात्मक कार्यक्रम करण्यात येत आहेत. अशा वेळी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने हे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन
महापालिकेच्या रखडलेल्या ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण होणार !
बाजीप्रभु देशपांडे आणि शिवा काशीद या नरविरांचे स्मरण करण्यासाठी ३० जुलैला ‘पावनखिंड मोहिमे’चे आयोजन !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
उद्योगाच्या यशासाठी अध्यात्माची जोड आणि साधनेची आवश्यकता अनिवार्य ! – डॉ. रवींद्र प्रभुदेसाई, पितांबरी उद्योगसमूह