
१. सौ. लक्ष्मी शशिकांत पाटील (पू. कलावतीआईंच्या भक्त), मु. माडीगुंजी, तालुका खानापूर, जिल्हा बेळगाव, कर्नाटक.
अ. ‘आश्रम पाहून मला समाधान वाटले.
आ. आश्रमात आल्यावर मला सद्गुरूंचे महत्त्व समजले.
इ. या आश्रमासारखे वातावरण मी आणखी कुठेही अनुभवले नाही.
ई. येथे आल्यावर ‘देवाने मला आशीर्वाद दिला’, असे मी अनुभवले.’ (३०.४.२०२३)
२. श्री. रामा टोपाण्णा घाडी (पू. कलावतीआईंचे भक्त), मु. माडीगुंजी, तालुका खानापूर, जिल्हा बेळगाव, कर्नाटक.
अ. ‘आज मी रामनाथी आश्रमात पहिल्यांदाच आलो आहे. तुमचे धर्माविषयीचे प्रवचन ऐकल्यावर ‘सात्त्विक आणि असात्त्विक म्हणजे काय ? देवतांची चित्रे अन् नामजप यांमध्ये किती सामर्थ्य आहे ?’, हे माझ्या लक्षात आले.
आ. ‘आश्रमजीवन प्रत्यक्षात कसे जगायचे ? जगामध्ये हिंदु संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे’, हे आश्रम पाहून मला समजले.
‘प्रत्येक माणसाने जीवनात साधना करावी आणि मानवजन्माचे सार्थक करून घ्यावे’, ही माझी कळकळीची विनंती !’ (३०.४.२०२३)
३. सौ. श्रद्धा सिनकर, मुलुंड, मुंबई.
अ. ‘आपण आश्रमातील उपक्रमात कुठल्यातरी प्रकारे सहभागी व्हावे’, असे मला वाटले.
आ. येथे अमाप सात्त्विक ऊर्जा जाणवली.
इ. येथे खरोखर किती समर्पणाने देशकार्य चालू आहे !
ई. आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की, आज हा आश्रम पहाण्याचा योग आला.’ (२८.५.२०२३)
सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून दिलेले अभिप्राय
१. श्री. रामा टोपाण्णा घाडी
अ. ‘सूक्ष्म जगत् म्हणजे प्रत्यक्ष न दिसणारी दैवी शक्ती कशी आहे आणि नामजप हा किती सामर्थ्यवान आहे !’, हे कळून आले.
आ. आजच्या वैज्ञानिक जगतात सत्य आणि असत्य काय आहे ?’, हे लक्षात आले.’ (३०.४.२०२३)
२. सौ. श्रद्धा सिनकर
अ. ‘केवळ अद्भुत ! ‘आपल्याला आलेल्या अनुभवाला एवढा गहन अर्थ असू शकतो’, हे माझ्या लक्षात आले.
आ. ‘आपण किती अहंकार बाळगून असतो !’, याची मला पदोपदी जाणीव झाली.’ (२८.५.२०२३)
| सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्याला होते, त्याला सूक्ष्म-जगत् असे संबोधतात. |
प्रेमळ आणि इतरांना निरपेक्षतेने साहाय्य करणारे फोंडा (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. आत्माराम जोशी (वय ८० वर्षे) !
मनोरुग्णांची स्थिती पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’च्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रिये’ला प्राधान्य देण्याचे साधिकेच्या लक्षात आलेले महत्त्व !
पू. शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे संत, वय ७९ वर्षे) आणि श्री. तुकाराम लोंढे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६० वर्षे) यांनी अनुभवलेली प्राणदाते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा !
गुरुकार्य वृद्धींगत होण्याचा आणि साधकांना घडवण्याचा ध्यास असलेल्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये !
देवाची आवड असणार्या आणि मुलीला सेवा करायला प्रोत्साहन देणार्या आगवे (तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) सुमती गजानन नाखरे (वय ८२ वर्षे) !
प्रभुदेसाई कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !