|

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानचे सैन्यदलप्रमुख जनरल आसिम मुनीर हे अमेरिकी दौर्यावर असून त्यांनी नुकतीच संयुक्त राष्ट्रांचे महासचिव जनरल एंटोनियो गुटेरेस यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी काश्मीरचे सूत्र उपस्थित करून म्हटले की, दक्षिण आशियात शांती तेव्हाच स्थापित होईल, जेव्हा काश्मीर वादावर तेथील लोकांची मते आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा प्रस्ताव यांच्या आधारावर उपाय काढला जाईल.
सौजन्य आज टीव्ही ऑफीशियल
जनरल मुनीर यांनी गुटेरेस यांच्याशी बोलतांना भारताने काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० हटवल्यावरूनही विरोध दर्शवला. भारताचा हा निर्णय एकतर्फी आणि संयुक्त राष्ट्रांच्या प्रस्तावांच्या विरोधात होता, असे ते म्हणाले. याआधी जनरल मुनीर यांनी अमेरिकी परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन आणि संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन यांचीही भेट घेतली. या वेळीही त्यांनी काश्मीरचे सूत्र उपस्थित केले होते.
जनरल मुनीर यांनी पॅलेस्टाईनवर होत असलेल्या आक्रमणावरही चिंता व्यक्त केली असून लवकरात लवकर युद्धबंदी घोषित करण्याची मागणीही केली.
संपादकीय भूमिकाकाश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. ‘बाणेदार भारताने तेथील कलम ३७० हटवल्याने आणि आता तो पाकव्याप्त काश्मीरवरही नियंत्रण मिळवेल कि काय ?’, या धास्तीनेच पाकचे सैन्यदलप्रमुख अमेरिकेत विनवणी करत आहेत, हे लक्षात घ्या ! |
पाकव्याप्त काश्मीरची भारतात ‘घरवापसी’ करतांना भारताची भूमिका काय असावी ?
पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तान येथील जनआंदोलनांचे भारताच्या दृष्टीकोनातून सामरिक विश्लेषण
दक्षिण आफ्रिकेत १७ सहस्र हिंदूंनी एकत्र येऊन केले हनुमान चालिसाचे पठण !
इराणच्या आक्रमणात जॉर्डनमधील २ अमेरिकी सैनिक ठार : अमेरिकेचे प्रत्युत्तर !
मी मुसलमान आहे; पण देशात शरीयत लागू करणार नाही ! : Burkina Faso President Ibrahim
पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलकांवरील दडपशाहीविषयी संयुक्त राष्ट्रांकडून चिंता व्यक्त !