भारत-बांगलादेश यांच्यातील संबंधांविषयी पंतप्रधान मोदी यांचे वक्तव्य !

नवी देहली – भारत आणि बांगलादेश यांच्या यशस्वीतेसाठी आम्ही काम करत आहोत. आमचे संबंध सातत्याने उंची गाठत आहेत. गेल्या ९ वर्षांत आम्ही मिळून जेवढे काम केले आहे, ते गेल्या अनेक दशकांत झालेले नाही, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी १ नोव्हेंबर या दिवीशी दोन्ही देशांतील ३ प्रकल्पांचे उद्घाटन केले. यांमध्ये अखौरा आणि आगरतळा यांना जोडणारी रेल्वे योजना, बांगलादेशातील मोंगला बंदर रेल्वे मार्ग आणि ‘मैत्री थर्मल पॉवर प्लांट’ यांच्या उद्घाटनांचा समावेश आहे. या प्रसंगी मोदी बोलत होते.
ये बहुत खुशी की बात है कि हम एक बार फिर भारत-बांग्लादेश सहयोग की सफलता को सेलिब्रेट करने के लिए एकसाथ जुड़े हैं। हमारे संबंध निरंतर नई ऊंचाइयां छू रहे हैं। पिछले 9 वर्षों में हमने मिलकर जितना काम किया है, इतना काम कई दशकों में भी नहीं हुआ थाः पीएम @narendramodi #PMModi… pic.twitter.com/qaWzvf6THA
— MyGovIndia (@mygovindia) November 1, 2023
या वेळी शेख हसीना म्हणाल्या की, भारत-बांगलादेश यांच्यातील तीन प्रकल्पांचे उद्घाटन हे आमची चांगली मैत्री आणि सहकार्य यांचे दर्शन घडवते. पंतप्रधान मोदी यांच्या पुढाकाराने हे शक्य झाले आहे.
संपादकीय भूमिकायासह बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंवर सातत्याने होणार्या आक्रमणांविषयी पंतप्रधान मोदी यांनी शेख हसीना यांच्याशी चर्चा करून तेथील हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलावीत, अशी समस्त हिंदूंची अपेक्षा आहे ! |
कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्या मुख्यमंत्र्यांची २० जूनला पाण्यासाठी महत्त्वाची बैठक
पावसाळ्यापूर्वी वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे पूर्णत्वाकडे !
भीमाशंकर भाविकांसाठी प्रवेशिका (पास) घेण्याचा सक्तीचा निर्णय प्रशासनाने मागे घेतला !
Provident Fund : केंद्र सरकारकडून भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजाला संमती
सांगली येथील ‘दावल मलिक दर्गा’ पाडून अवैध मदरसा तात्काळ भुईसपाट करा !
१५ दिवसांत एस्.टी.च्या उत्पन्नात ४३ कोटी ८३ लाखांची वाढ !