बिहारमध्ये विषारी दारू प्यायल्याने दोघांचा मृत्यू !

मुझफ्फरपूर (बिहार) – येथील पोखरिया पीर गावामध्ये विषारी दारू प्यायल्याने २ जणांचा मृत्यू, तर दोघांची दृष्टी गेली आहे. लोकांचा आरोप आहे की, या गावात रहाणारा शिवचंद्र पासवान दारू विकत असून तो पसार झाला आहे. पोलिसांनी त्याची पत्नी आणि मुलगी यांना कह्यात घेतले आहे. (जे लोकांना ठाऊक आहे, ते पोलिसांना ठाऊक नव्हते, असे कसे म्हणता येईल ? – संपादक)

बिहारमध्ये दारूबंदी आहे. तरीही राज्यात देशी आणि विदेशी दारूची विक्री होत आहे, असा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. महिलांनी सांगितले की, येथे कोणतीही दारूबंदी नाही. येथे सहजतेने दारू मिळते.

संपादकीय भूमिका

बिहारमध्ये दारूबंदी असतांना तथे सहजतेने दारू मिळते. याचाच अर्थ तेथील पोलीस आणि प्रशासन किती भ्रष्ट आहेत, हे स्पष्ट होते !