
जिनिव्हा (स्वित्झर्लंड) – भारतात नागरिकत्व संशोधन कायद्यावरून वाद चालू आहे. अशातच संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत या विषयावर चर्चा झाली. या वेळी ‘राजस्थान समग्र कल्याण संस्थान’चे सदस्य सत्यनारायण शर्मा यांनी नागरिकत्व संशोधन कायद्यातील महत्त्वपूर्ण सूत्रांवर प्रकाश टाकला. शर्मा यांनी पाकिस्तानातून भारतात आलेल्या हिंदु शरणार्थींच्या भयावह परिस्थितीविषयीही परिषदेला अवगत केले.

या वेळी शर्मा म्हणाले की, दुसर्या देशात आश्रय घेणे अत्यंत कठीण असते. नुकत्याच जोधपूर, बाडमेर आणि कर्णावती यांसह काही भागांत विस्थापित पाकिस्तानी हिंदूंना भारताचे नागरिकत्व प्रदान करण्यात आले. पीडितांकडे त्यांच्या देशात भूमी, संपत्ती आणि शेती होती; परंतु केवळ धर्माच्या आधारावर त्यांच्याकडून ते सर्व हिरावून घेण्यात आले. अंतत: अत्याचारांना कंटाळून त्यांना त्यांची जन्मभूमी, नातेवाईक आणि मित्र परिवार सर्व सोडून भारतात यावे लागले. लोक केवळ भयापोटी स्वत:ची मातृभूमी त्यागतात, हा गंभीर आणि चिंतेचा विषय आहे.
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
नाशिकमध्ये पहिल्याच पावसात खोदलेल्या रस्त्यांवर चिखल !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !
अंबरनाथ येथे कचर्याच्या ढिगार्यात गोवंशाचे अवशेष आढळले !
Delhi Hotel Fire : देहलीतील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीमध्ये २१ जणांचा मृत्यू