
जिनिव्हा (स्वित्झर्लंड) – भारतात नागरिकत्व संशोधन कायद्यावरून वाद चालू आहे. अशातच संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत या विषयावर चर्चा झाली. या वेळी ‘राजस्थान समग्र कल्याण संस्थान’चे सदस्य सत्यनारायण शर्मा यांनी नागरिकत्व संशोधन कायद्यातील महत्त्वपूर्ण सूत्रांवर प्रकाश टाकला. शर्मा यांनी पाकिस्तानातून भारतात आलेल्या हिंदु शरणार्थींच्या भयावह परिस्थितीविषयीही परिषदेला अवगत केले.

या वेळी शर्मा म्हणाले की, दुसर्या देशात आश्रय घेणे अत्यंत कठीण असते. नुकत्याच जोधपूर, बाडमेर आणि कर्णावती यांसह काही भागांत विस्थापित पाकिस्तानी हिंदूंना भारताचे नागरिकत्व प्रदान करण्यात आले. पीडितांकडे त्यांच्या देशात भूमी, संपत्ती आणि शेती होती; परंतु केवळ धर्माच्या आधारावर त्यांच्याकडून ते सर्व हिरावून घेण्यात आले. अंतत: अत्याचारांना कंटाळून त्यांना त्यांची जन्मभूमी, नातेवाईक आणि मित्र परिवार सर्व सोडून भारतात यावे लागले. लोक केवळ भयापोटी स्वत:ची मातृभूमी त्यागतात, हा गंभीर आणि चिंतेचा विषय आहे.
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
हिंदूंना शत्रूबोध नाही !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
प्रवाशाला लुटणार्या दोघांना सुनावली पोलीस कोठडी