
पुणे – वाहतूक नियमभंगाच्या थकीत दंड प्रकरणांचा निपटारा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांसाठी ‘साहाय्य केंद्रा’ची उभारणी केली आहे. आतापर्यंत १ सहस्र ७०० वाहनचालकांचा दंड न्यून करण्यात आला आहे. हे ‘साहाय्य केंद्र’ ८ सप्टेंबरपर्यंत कार्यान्वित रहाणार आहे. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून ९ सप्टेंबर या दिवशी ‘लोक अदालती’चे आयोजन केले आहे.
प्रलंबित खटले तडजोडीने संपवणे, थकीत दंडाची रक्कम अल्प करणे, तसेच वाहनचालकांना मार्गदर्शन करणे यांसाठी पोलिसांची पथके सिद्ध आहेत. ‘साहाय्य केंद्रा’त थकीत दंड अल्प करून घेण्यासाठी येणार्या वाहनचालकांनी ‘आधार कार्डा’ची छायांकित प्रत आणावी, असे आवाहन वाहतूक पोलीस आणि पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.
हिंदूंनो धर्माभिमान जागृत करून धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हा ! – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती
यावर्षी देशात ९०, तर महाराष्ट्रात ९८ टक्के पावसाची शक्यता !
भ्रमणभाषच्या जगात वावरतांना श्रीकृष्णाचे स्मरण ठेवा – ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास
सत्संगात नसलेल्यांची स्थिती भरकटलेल्या पतंगासारखीच – ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास
निर्णयक्षमता गमावलेल्या युवकांसाठी भागवत ग्रंथ आधार वाटतो ! – ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास
पोलीस कर्मचारी आणि मुख्य आरोपी यांचा भ्रमणभाषवर संपर्क !