नवी मुंबईत भ्रमणभाषची चोरी करणार्या ३ आरोपींना अटक !

१३ लाख ६७ सहस्र रुपयांचे १०५ भ्रमणभाष जप्त

प्रतिकात्मक चित्र

नवी मुंबई – येथे भ्रमणभाषची चोरी करणार्‍या ३ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी चोरी केलेले १३ लाख ६७ सहस्र रुपयांचे विविध आस्थापनांचे चोरलेले १०५ भ्रमणभाष जप्त करण्यात आले आहेत. अमोल पाटील, अनिकेत पाटील, विनायक मोरे अशी आरोपींची नावे आहेत. एका नागरिकाच्या भ्रमणभाषची चोरी झाल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. अन्वेषणाअंती वरील कारवाई करण्यात आली.