मुंबई – ज्येष्ठ लेखक, पत्रकार आणि कथाकथनकार शिरीष कणेकर यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले आहे. खास शैलीतून टोकदार, तसेच उपाहासात्मक लिखाण करणारे शिरीष कणेकर यांचे अनेक चाहते आहेत. ते सामाजिक समस्यांवर विनोदी शैलीतून बोट ठेवत. चित्रपट, क्रिकेट आणि राजकारण हे त्यांच्या लिखाणाचे प्रमुख विषय होते. अत्यंत खुमासदार लिखाणाच्या पद्धतीमुळे ते प्रसिद्ध होते. जवळजवळ सर्वच प्रसिद्ध इंग्रजी आणि मराठी वृत्तपत्रे अन् नियतकालिके यांतून त्यांनी विपुल स्तंभलेखन केले. ‘लगाव बत्ती’ या कथासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा आणि उत्कृष्ट विनोदी वाङ्मयाचा ‘चिं.वि. जोशी’ पुरस्कारही त्यांना मिळाला होता.
शिरीष कणेकर काळाच्या पडद्याआड !
नूतन लेख
- वडीलधार्यांच्या आयुष्यात आनंद आणि समाधानाचे क्षण आणण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ ! – मुख्यमंत्री
- श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीकडून कायदा आणि नियम यांचे उल्लंघन करून अवैध चाकरभरतीचा आरोप !
- गड-दुर्ग संवर्धनासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी !
- दिवाळी लक्षात घेऊन विधानसभा निवडणुकीचा दिनांक घोषित करू !- राजीव कुमार, मुख्य निवडणूक आयुक्त
- थोडक्यात महत्त्वाचे : रावेर येथे पावसामुळे ४७१ शेतकर्यांची हानी; वसई येथे खाणीत २ मुले बुडाली !
- स्वामी समर्थांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणार्या ज्ञानेश महारावांसह आयोजकांवर गुन्हे नोंदवा !