वीर सावरकर उवाच !

व्‍यवहार आणि नीतीशास्‍त्र यांतील एखादा गुण माणसाला हितकारक असतो तोपर्यंत तो सद़्‍गुण समजला गेला पाहिजे; पण तोच गुण ज्‍या वेळी मनुष्‍य जातीला घातक ठरतो किंवा मनुष्‍याला अध:पतित करण्‍यासाठी कारणीभूत ठरतो, त्‍या वेळी तोच सद़्‍गुण दुर्गुणात रूपांतरित होतो. (साभार : ‘सहा सोनेरी पाने’, सोनेरी पान पाचवे-प्रकरण चौथे)