
जकार्ता (इंडोनेशिया) – भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी त्यांच्या इंडोनेशियामधील दौर्यात कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री मेलानी जोली यांची भेट घेतली. या वेळी जयशंकर यांनी कॅनडामधील भारतीय राजदुतांचे संरक्षण सुनिश्चित करण्याच्या सूत्राकडे जोली यांचे लक्ष वेधले. तसेच हिंसात्मक कारवाया करण्यासाठी चिथाववणार्या शक्तींशी सामना करण्याच्या सूत्रालाही अधोरेखित केले. जयशंकर यांनी या भेटीविषयी ट्वीट करून माहिती दिली. गेल्या काही कालावधीपासून कॅनडातील खलिस्तानी आतंकवाद्यांकडून भारतविरोधी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर जयशंकर यांनी वरील विधान केले.
जकार्ता येथील दौर्यात जयशंकर यांनी चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या केंद्रीय विदेश आयोग कार्यालयाचे निर्देशक वांग यी यांचीही भेट घेतली. या वेळी दोन्ही नेत्यांनी भारत-चीन सीमावर्ती क्षेत्रांमध्ये शांतता आणि सौहार्द प्रस्थापित होण्यासाठी प्रलंबित सूत्रांवर चर्चा केली.
Pakistani Soldiers Loot POK : पाकिस्तानच्या सैनिकांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पेट्रोलपंप लुटला !
US-Iran War : अमेरिका आणि इराण यांची एकमेकांवरील आक्रमणे थांबवण्याची सिद्धता
Iran Nuclear Bomb : इराणच्या स्वसंरक्षणासाठी अणूबाँब बनवण्याला पर्याय नाही !
Kota Conversion Racket : कोटा (राजस्थान) येथे हिंदु महिलांचे धर्मांतर आणि लैंगिक शोषण होत असल्याचे उघड
कराचीमधील आक्रमणामागे हात असल्याचा आरोप भारताने फेटाळला !
France Heatwave : फ्रान्समध्ये उष्णतेमुळे ४ दिवसांत १ सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्यू