ठाणे, ८ जुलै (वार्ता.) – ठाणे येथून बोरिवलीला जाणार्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एस्.टी.) बसला येथील पूर्व द्रुतगती महामार्गावर ८ जुलै या दिवशी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. बस आणि कंटेनर यांची धडक झाल्याने वाहक बसलेल्या बसच्या दर्शनी भागाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. या वेळी बसमध्ये ९ प्रवासी होते. त्यामधील बस वाहक अमर परब आणि प्रवासी महिला गीता कदम हे दोघे घायाळ झाले आहेत. त्यांच्यावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार चालू आहेत. त्या दोघांच्या पायांना दुखापत झालेली आहे, तर इतर प्रवासी सुखरूप आहेत. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > ठाणे येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसला अपघात, २ जण घायाळ !
ठाणे येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसला अपघात, २ जण घायाळ !
नूतन लेख
- बीड येथे चारचाकी वाहनातून १ कोटी रुपयांची रक्कम जप्त !
- मावळमधील (पुणे) ‘वंचित’च्या उमेदवारासह निवडणूक आयोगाची नोटीस !
- धर्मांध भाडेकरूकडून हिंदु घरमालकाचा हातोड्याने खून !
- अमरावती येथे आईने पैसे परत न केल्याने धर्मांधांकडून मुलीचा विनयभंग !
- विभागीय भरारी पथकाद्वारे जिल्ह्यात ८६ सहस्र ३५९ रुपयांचा अवैध साठा जप्त !
- मतदारांना भेटण्यासाठी निवडणूक आयोगाकडून सर्वसाधारण निरीक्षक भुवनेश प्रताप सिंग यांची नियुक्ती