(म्हणे) ‘बजरंग दलावर बंदीचा निर्णय ७० वर्षांपूर्वी घेतला असता, तर देश अधोगतीला गेला नसता !’ – ‘जमियत उलेमा-ए-हिंद’चे अध्यक्ष सय्यद अर्शद मदनी

‘जमियत उलेमा-ए-हिंद’चे अध्यक्ष सय्यद अर्शद मदनी यांचे फुत्कार !

‘जमियत उलेमा-ए-हिंद’चे अध्यक्ष सय्यद अर्शद मदनी

मुंबई – काँग्रेसने कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत प्रसारित केलेल्या घोषणापत्रात बजरंग दलावर बंदी घालण्याचे आश्‍वासन दिले आहे. जर हा निर्णय ७० वर्षांपूर्वी घेतला असता, तर आज देश अधोगतीला गेला नसता, असे विधान जमियत उलेमा-ए-हिंद के अध्यक्ष सैयद अरशद मदनी यांनी मुंबई येथे केले.

मदनी पुढे म्हणाले की, काँग्रेसने घोषणापत्रात बंदीचे आश्‍वासन दिल्याने चूक केली, असेही म्हटले जात आहे. मला वाटते ही चूक नाही, तर चूक सुधारण्याचा प्रयत्न आहे. (काँग्रेसने जिहादी संघटनांवर बंदी घातली नाही, हीच मोठी चूक आहे ! तसेच मुसलमान संघटना, त्यांचे नेते, धर्मगुरू कधीही जिहादी आतंकवाद्यांच्या विरोधात चकार शब्द काढत नाहीत, तसेच त्यांना संघटितपणे विरोध करत नाहीत. उलट जिहादी संघटनांवर बंदी घातली, त्याला विरोध करतात, हे लक्षात घ्या ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • बजरंग दलाची स्थापना वर्ष १९८४ मध्ये झाली आहे आणि काँग्रेसने तिच्यावर वर्ष १९९२ मध्ये देशभरात बंदी घातली होती; मात्र वर्षभरानंतर ती हटवण्यात आली. हा इतिहास ठाऊक नसणारे मदनी सारखे हिंदुद्वेषी अशा प्रकारची हास्यास्पद विधाने करतात !
  • काँग्रेसने जिहादी आतंकवादी संघटनांचा नायनाट तिच्या कार्यकाळात केला असता, तर काश्मीरमध्ये हिंदूंना वंशसंहार झाला नसता, त्यांना तेथून पलायन करावे लागले नसते, देशातील सहस्रो लोकांचा आतंकवाद्यांमुळे मृत्यू झाला नसता, हे मदनी का सांगत नाहीत ?